शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Budget 2021: जिल्ह्यातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी हवा निधी; जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:36 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका... 

उल्हासनगर ध्वनिप्रदूषणात अव्वल आहे. ‘हिराली’ मार्फत प्रदूषणाबाबत आवाज उठविला जात आहे. सरकारने वेळेत पर्यावरणाबाबत पाऊले उचलायला हवीत. अर्थसंकल्पात नुसता निधी राखून ठेवून चालणार नाही. यासाठी पर्यावरणाबाबत जागृती करणेही महत्त्वाचे आहे. - सरिता खानचंदानी,हिराली फाउंडेशन

 वालधुनी नदी देशातील सर्वाधिक प्रदूूषित नदींच्या यादीत आहे.   ठाणे जिल्ह्याला पिण्याचे पाणी देणाऱ्या उल्हास नदीची वाटचाल वालधुनीच्या दिशेने होत आहे. अर्थसंकल्पामध्ये उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी निधी ठेवला पाहिजे.- शशिकांत दायमा, वालधुनी- उल्हास नदी बचाव संघटना

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे. आपल्या देशात प्रदूषणामुळे जल, जमीन, वायू हे सर्वच प्रदूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या बाबतीत विविध प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. - विजय भोसले, पर्यावरणप्रेमी

संविधानामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीनिश्चित केलेली आहे. अनेक कायदे व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून सोयीनुसार करून परवानग्या देणे बंद झाले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी बजेटमध्ये जास्तीची तरतूद करणे आवश्यक आहे.  - रूपाली श्रीवास्तव, पर्यावरणप्रेमी

केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपाय व संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केली गेली पाहिजे. केवळ पर्यावरण संरक्षणाचा बोलघेवडेपणा शासनाने करू नये. पर्यावरणाचे संरक्षण करून विकास व्हायला हवा. - कृष्णा गुप्ता, पर्यावरणप्रेमी, भाईंदर

टॅग्स :budget 2021बजेट 2021riverनदीenvironmentपर्यावरण