शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

Budget 2021: जिल्ह्यातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी हवा निधी; जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:36 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका... 

उल्हासनगर ध्वनिप्रदूषणात अव्वल आहे. ‘हिराली’ मार्फत प्रदूषणाबाबत आवाज उठविला जात आहे. सरकारने वेळेत पर्यावरणाबाबत पाऊले उचलायला हवीत. अर्थसंकल्पात नुसता निधी राखून ठेवून चालणार नाही. यासाठी पर्यावरणाबाबत जागृती करणेही महत्त्वाचे आहे. - सरिता खानचंदानी,हिराली फाउंडेशन

 वालधुनी नदी देशातील सर्वाधिक प्रदूूषित नदींच्या यादीत आहे.   ठाणे जिल्ह्याला पिण्याचे पाणी देणाऱ्या उल्हास नदीची वाटचाल वालधुनीच्या दिशेने होत आहे. अर्थसंकल्पामध्ये उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी निधी ठेवला पाहिजे.- शशिकांत दायमा, वालधुनी- उल्हास नदी बचाव संघटना

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली पाहिजे. आपल्या देशात प्रदूषणामुळे जल, जमीन, वायू हे सर्वच प्रदूषित होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष पर्यावरणाकडे देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या बाबतीत विविध प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. - विजय भोसले, पर्यावरणप्रेमी

संविधानामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारीनिश्चित केलेली आहे. अनेक कायदे व न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून सोयीनुसार करून परवानग्या देणे बंद झाले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी बजेटमध्ये जास्तीची तरतूद करणे आवश्यक आहे.  - रूपाली श्रीवास्तव, पर्यावरणप्रेमी

केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर उपाय व संवर्धनासाठी आर्थिक तरतूद केली गेली पाहिजे. केवळ पर्यावरण संरक्षणाचा बोलघेवडेपणा शासनाने करू नये. पर्यावरणाचे संरक्षण करून विकास व्हायला हवा. - कृष्णा गुप्ता, पर्यावरणप्रेमी, भाईंदर

टॅग्स :budget 2021बजेट 2021riverनदीenvironmentपर्यावरण