शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड, देशातील पहिलीच महापालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 3:01 AM

ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता ४३५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात २५० पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे ८१ महिलांचीही भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील जाहिरात येत्या १५ दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत. अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून येथे नव्याने इमारतींचे इमले उभे राहत असून मॉल संस्कृती झपाट्याने वाढू लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न गहन होऊ लागला आहे. मागील वर्षभरात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीसुद्धा वित्तहानी अधिक झालेली आहे. वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणाला ठाणे अग्निशमन दल अपुरे पडू लागले आहे. काही दिवसांपूर्वी दिव्यातील अग्निशमन केंद्र सुरू केले आहे.१५ दिवसांत देणार भरतीची जाहिरातविधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्यानुसार, आता विविध खात्यांत पदांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आता ठाणे अग्निशमन दलात ४३५ पदांची भरती ही टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. त्यानुसार, आता २५० च्या आसपास पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये महिलांना खास ३० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केलेली असून त्याची जाहिरात येत्या १५ दिवसांत काढली जाणार आहे. त्यानंतर, इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर, पुढील चार महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानुसार, ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. आता या फायरमन महिलांनादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळणार आहे.येथे होणार नवी अग्निशमन केंद्रेभविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि शहराचा होणारा विस्तार पाहता, ठाणे महापालिकेने नितीन कंपनी, ओवळा, देसाईगाव, कोलशेत, कळवा हॉस्पिटलजवळ, वर्तकनगर, व्होल्टास, डायघर आणि पारसिक या नऊ ठिकाणी नव्याने अग्निशमन केंदे्र सुरूकरण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला २७ सप्टेंबर २०११ रोजी मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, सध्याच्या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ च्या स्टाफची गरज आहे.ठाणे महापालिका हद्दीतसात अग्निशमन केंद्रेठाणे महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने १९९१ मध्ये अग्निशमन केंद्रासाठी लागणारा कर्मचारीवर्ग आणि भविष्यात वाढणाºया लोकसंख्येच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, आज लोकसंख्या २२ लाखांवर गेली असली, तरी कर्मचाºयांचा स्टाफ हा ३४० एवढाच आहे. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवर अधिक कामाचा ताण पडत असून त्यांना नव्या अत्याधुनिक यंत्रणांचा सराव नसल्याने त्यांची कुमक आग विझवण्याच्या ठिकाणी कमी पडत आहे. सध्या ठाणे महापालिका हद्दीत सात अग्निशमन केंद्रे असून त्यामध्ये एकूण ३४० अधिकारी, कर्मचारीवर्गाचा स्टाफ आहे. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. त्याचा शुभारंभ अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाºयांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणे