शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

लाच प्रकरणातील अधिकारी झाले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:33 PM

पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.

- पंकज पाटीलअंबरनाथ आणि बदलापुरात लाच प्रकरणात जे कोणी अधिकारी अडकले, ते पुन्हा पालिकेत फिरकलेच नाही. त्यांची परस्पर बदली करण्यात आली. पालिकेतील जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले, त्यांना वर्ष-दोन वर्षांनंतर सेवेत घेतले गेले. मात्र, त्यांना कामाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत सर्वात मोठा सापळा रचला गेला, तो मुख्याधिकारी राजेश कानडे असताना. राजेश कानडे हे पूर्वी अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी होते. त्यांची बदली करून त्यांना बदलापूरला पाठविण्यात आले. मात्र, काही बांधकाम व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पटत नसल्याने त्यांच्याविरोधात कटकारस्थान रचले गेले. त्यांचे निकटचे सहकारी दिनेश नेरकर हे नगररचना सहायकपदावर काम करीत होते. नेरकर यांनी एका प्रकरणात लाच स्वीकारून थेट मुख्याधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले होते. त्यामुळे सापळ्यात मुख्याधिकारी कानडे आणि त्यांचे सहकारी नेरकर हे दोघे अडकले. याप्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना कानडे यांनी पुन्हा पालिकेत न फिरकण्याचा निर्णय घेतला. तर, नेरकर हे परजिल्ह्यात बदली करून निघून गेले. असाच प्रकार अंबरनाथमध्येदेखील घडला. पालिकेचे उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांची चौकशी झाल्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नार्वेकर यांची शासनाने परजिल्ह्यातील नगर परिषदेत बदली केली. असाच एक प्रकार अंबरनाथच्या नगररचना विभागातही घडला. सहायक नगररचनाकार चव्हाण यांच्याविरोधात लाच प्रकरणात सापळा रचण्यात आला होता. मात्र, चव्हाण हे लाचलुचपत विभागाच्या हातावर तुरी देऊन तेथून पळून गेले. ते अधिकाºयांच्या हातात न सापडल्याने त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या. या प्रकरणानंतरही चव्हाण पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू होण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, राज्य शासनाने त्यांची दुसºया नगर परिषदेत बदली केली.अधिकाºयांसह जे कर्मचारी लाच प्रकरणात अडकले आहेत, ते देखील मूळ प्रवाहाच्या बाहेरच राहिले आहेत. त्यांना पालिकेच्या मूळ आणि जबाबदारीच्या पदापासून दूर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग