शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या मार्गात जमीन संपादनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:47 IST

डेडलाइन एक वर्ष लांबणीवर पडणार : अवघ्या ०.९ हेक्टरच जमिनीचे संपादन

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जमीन संपादनास शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. यामुळे आॅगस्ट २०२२पर्यंत ती सुरू करणे अशक्य असल्याचे ती विकसित करणाºया जपानने कळविले आहे. यामुळे बुलेट ट्रेनसाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने आता गुजरातसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकºयांच्या बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेऊनच जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांची बैठक २९ मे रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आयोजिली आहे. जमीनच संपादित झाली नसल्याने बुलेट ट्रेन सुरू होण्याची डेडलाइन डिसेंबर २०२३पर्यंत पुढे सरकू शकते, असेही जपान सरकारने नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला कळविले आहे.राज्यातील एक इंचही जमीन संपादित नाहीआतापर्यंत बुलेट ट्रेन जेथून सुरू होणार आहे, त्या मुंबईतील वांद्रा-कुर्ला संकुलातील ०.९ हेक्टर जमीन वगळता राज्यातील एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. शेतकºयांसह शिवसेना-मनसेसारख्या राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्रात नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच पालघरची पोटनिवडणूक लागल्यामुळे त्या भागात तूर्तास रेल्वे मंत्रालयाने भाजपा उमेदवारासाठीच्या मतांच्या बेगमीकरिता बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादन थांबविले आहे. राज्यात काही ठिकाणी सर्व्हे आणि मोजणी झालेली आहे. मात्र, संपादन झालेले नाही.महाराष्ट्रासह गुजरातच्या शेतकºयांकडून विरोधबुलेट ट्रेनमुळे गुजरातची १९२ तर महाराष्ट्रातील १२० गावे बाधित होणार आहेत. ५०८ किमीच्या या माार्गापैकी ४८७ किमी उन्नत तर२२ किमी भूमिगत मार्ग आहे. मात्र, त्यासाठी दोन्ही राज्यांतील जी जमीन जाणार आहे, त्यातील बहुतेक जमीन सुपीक आहे. यामुळे शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्त दर मागितला आहे. तो देण्यास सरकार तयार नसल्याने शेतकºयांचा विरोध दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.गुजरातमध्ये येत्या डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण जमीन संपादित करण्याचा नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचा मानस आहे.मात्र, आता शेतकºयांच्या मागणीमुळे त्यात अडथळा निर्माण झाला आहे.गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सरकार दरएकरी रेडीरेकननुसान सहा ते सात लाख रुपये देऊ पाहत आहे. मात्र, बाजारभाव ५० ते ६० लाख रुपये असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.दिवा भागात तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जमिनीच्या सर्व्हेस विरोध करून मोजणीच्या मशीनही फेकून दिल्या होत्या. यानंतर दीडशे कार्यकर्त्यांपैकी पोलिसांनी अवघ्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. राष्ट्रवादीनेही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शविला आहे.राष्ट्रीय महामार्गालगतच्या जमिनीसाठी हाच दर एक कोटीच्या घरात आहे. तर सुरतसारख्या शहरी भागात तो ३ ते ४ कोटींच्या घरात आहे. दक्षिण गुजरातमध्ये आंबा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागातील अनेक शेतकरी भाजपा समर्थक असले तरी त्यांनी योग्य मोबदल्याशिवाय एक इंचही जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. असाच प्रकार ठाणे शहरालगतच्या दिवा भागात असून, शेतकºयांनी बाजारभावापेक्षा जास्त रक्कम मागितली आहे. यामुळे जमीन संपादनाअभावी या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामास बे्रक लागला आहे.या प्रकल्पाकरिता एकूण १४०० हेक्टर जमीन लागणार असून नॅशनल हायस्पीड कॉर्पोरेशनने त्यासाठी१० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.सीआरझेडसह पर्यावरण विभागाच्या परवानग्या हव्यातजमीन संपादनानंतर सीआरझेडसह वन आणि पर्यावरण खात्याच्या अनेक परवानग्यांचा अडथळा पार करावा आहे. कारण बुलेट ट्रेनसाठी जी जमीन लागणार आहे, त्यात ८३.५५ हेक्टर वनजमिनीचा समावेश असून यात महाराष्ट्रातील ७७.४५ तर गुजरातमधील ६.१० हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. याशिवाय ठाणे खाडीतील तिवरांचे शेकडो हेक्टर जंगल तोडावे लागणार आहे. तसेच तुंगारेश्वरसह अनेक वनांतून ही ट्रेन जाणार असून या संपूर्ण मार्गात४० ते ४५ हजार वृक्षांवर कुºहाड कोसळणार आहे. यासाठीच्या केंद्रीय वने आणि पर्यावरण खात्याच्या सर्व परवानग्यांसह न्यायालयीन लढाया पार केल्यानंतरच बुलेट ट्रेनच्या कामास खºया अर्थाने ‘स्पीड’ मिळणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन