शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Maharashtra Election 2019: जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त; सीमा सुरक्षा, राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:10 IST

Maharashtra Election 2019: ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे.

- जितेंद्र कालेकर 

ठाणे : सोमवारी होत असलेली विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या तसेच ग्रामीण कार्यक्षेत्रात पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्याही तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत १४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी चार हजार १६२ मतदानकेंदे्र असून या सर्व ठिकाणी सोमवारी सकाळी ६ ते शेवटचे मतदानयंत्र स्ट्राँग रूमध्ये जाईपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.

बंदोबस्तासाठी १२ उपायुक्तांच्या अधिपत्याखाली ३१ सहायक आयुक्त, १०७ पोलीस निरीक्षक, ४०६ सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, सहा हजार ९३ पोलीस कर्मचारी आणि १२९५ गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक आहे. यातील दोन हजार ९६२ पोलीस आणि १२०० गृहरक्षक दलाचे जवान हे मतदानकेंद्रांवर तैनात ठेवले आहेत. याशिवाय, नागालॅण्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन कंपन्या त्यात्या ठिकाणी तैनातीला आहेत. सहायक आयुक्त प्रत्येक मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार, पैसे वाटण्यासारखा किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार ते पाच वाहने अशी १५० अतिरिक्त वाहने भाड्यानेघेतली आहेत.

ग्रामीण भागांत तीन हजार पोलीस तैनात

ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात विधानसभेचे नऊ मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी तीन केंद्रीय निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात आहे. याठिकाणी सात उपअधीक्षक, २७ निरीक्षक, ११७ उपनिरीक्षक, १७५६ कर्मचारी आणि ८०० गृहरक्षक दलाची नेमणूक केली आहे. याठिकाणी १५१० बुथ असून ११० क्रिटिकल तर ११२ संवेदनशील केंद्रे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

प्रत्येक पाच मिनिटांमध्ये येणार पोलीस

यावेळी सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दर पाच मिनिटांनी मतदानकेंद्रावर पोलिसांच्या गस्तीचे पथक मतदानकेंद्रावर पोहोचणार आहे. प्रत्येक वेळी येणाºया वेगवेगळ्या पथकांना मतदानकेंद्रांवरील हालचाली आणि कोणत्याही गैरकृत्याची माहिती मिळेल. तसेच काही आढळल्यास हे पथक तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस