शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

Maharashtra Election 2019: जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त; सीमा सुरक्षा, राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:10 IST

Maharashtra Election 2019: ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे.

- जितेंद्र कालेकर 

ठाणे : सोमवारी होत असलेली विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या तसेच ग्रामीण कार्यक्षेत्रात पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्याही तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत १४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी चार हजार १६२ मतदानकेंदे्र असून या सर्व ठिकाणी सोमवारी सकाळी ६ ते शेवटचे मतदानयंत्र स्ट्राँग रूमध्ये जाईपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.

बंदोबस्तासाठी १२ उपायुक्तांच्या अधिपत्याखाली ३१ सहायक आयुक्त, १०७ पोलीस निरीक्षक, ४०६ सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, सहा हजार ९३ पोलीस कर्मचारी आणि १२९५ गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक आहे. यातील दोन हजार ९६२ पोलीस आणि १२०० गृहरक्षक दलाचे जवान हे मतदानकेंद्रांवर तैनात ठेवले आहेत. याशिवाय, नागालॅण्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन कंपन्या त्यात्या ठिकाणी तैनातीला आहेत. सहायक आयुक्त प्रत्येक मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार, पैसे वाटण्यासारखा किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार ते पाच वाहने अशी १५० अतिरिक्त वाहने भाड्यानेघेतली आहेत.

ग्रामीण भागांत तीन हजार पोलीस तैनात

ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात विधानसभेचे नऊ मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी तीन केंद्रीय निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात आहे. याठिकाणी सात उपअधीक्षक, २७ निरीक्षक, ११७ उपनिरीक्षक, १७५६ कर्मचारी आणि ८०० गृहरक्षक दलाची नेमणूक केली आहे. याठिकाणी १५१० बुथ असून ११० क्रिटिकल तर ११२ संवेदनशील केंद्रे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

प्रत्येक पाच मिनिटांमध्ये येणार पोलीस

यावेळी सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दर पाच मिनिटांनी मतदानकेंद्रावर पोलिसांच्या गस्तीचे पथक मतदानकेंद्रावर पोहोचणार आहे. प्रत्येक वेळी येणाºया वेगवेगळ्या पथकांना मतदानकेंद्रांवरील हालचाली आणि कोणत्याही गैरकृत्याची माहिती मिळेल. तसेच काही आढळल्यास हे पथक तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस