शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

सेनेच्या धक्क्याने भाजपात नाराजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:32 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.

- प्रशांत मानेकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. वरिष्ठांचे आदेश असतानाही शिवसेनेच्या स्थानिक राजकारणाने भाजपा नेते नाराज झाले असून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा सावध भूमिकेत राहणार आहे.२०१५ ला केडीएमसीची निवडणूक पार पडली. यात शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ , मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना भाजपाने संख्याबळाच्या आधारावर सत्ता स्थापन केली. सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे महापौर बसविण्याचा मान मिळविता आला, तर उर्वरित अडीच वर्षातील एक वर्ष भाजपा, तर दीड वर्षे शिवसेनेला मिळणार आहेत. १३ मे ला महापौरपदाचा शिवसेनेचा अडीच वर्षाचा कालावधी संपत आहे. पुढील मान भाजपाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दिलेल्या अनपेक्षित धक्क्याने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. शुक्रवारी दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. क प्रभाग वगळता अन्य नऊ प्रभागांत शिवसेना-भाजपाच्या वतीने प्रत्येकी एका सदस्यानेच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. क प्रभागात भाजपाच्या वतीने सचिन खेमा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात शिवसेनेचे मोहन उगले यांनीही उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली.दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी ५ प्रभाग समित्या असे वाटप झाल्याने निवडणुकीच्या वेळी उगले अर्ज मागे घेतील, अशा भ्रमात भाजपाचे पदाधिकारी होते. परंतु उगले यांनी उमेदवारी अर्ज जैसे थे ठेवला. यामध्ये प्रभागात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेची सरशी झाली आणि भाजपाच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. ही माघार भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असताना स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण खेळत वरिष्ठांचे निर्णय धाब्यावर बसविल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.याप्रकरणी भाजपाकडून महापौर राजेंद्र देवळेकरांना लक्ष केले जात आहे. देवळेकरांनी मात्र पक्षाचे जे काही निर्णय घ्यायचे असतात ते पदाधिकारी घेत असतात, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाला परवानगी मिळविण्यामध्ये मी व्यस्त होतो.संबंधित प्रभागात आमचे संख्याबळ जास्त असून त्या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही. यासंदर्भात योग्य माहिती पक्षाचे गटनेतेच देऊ शकतील, असे सांगत आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.वरिष्ठांच्या आदेशाला स्थानिकांची तिलांजलीप्रभाग समित्या प्रत्येकी पाच वाटून घ्यायच्या ठरल्या होत्या. तसे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आले होते. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याला तिलांजली दिल्याचे प्रभाग समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाले. यामुळे भाजपामध्ये नाराजी आहे ही वस्तुस्थिती आहे.महापौर राजेंद्र देवळेकरांनी काही लोकांना खुश करण्यासाठी आपल्या मर्जीप्रमाणे राजकारण केले आहे. आता येत्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम्हाला सावध भूमिकेत राहणे गरजेचे आहे, असे मत भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी ‘लोकमत’कडे मांडले.‘वरिष्ठांच्या आदेशानुसार होणार कृती’महापौरपदाची निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार आहे. यंदाचे पद भाजपाच्या वाट्याला जाणार असले तरी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचे जे आदेश येतील, त्याप्रमाणे कृती होईल, असे मत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मांडले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा