शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

भाजपा, शिवसेना युतीमुळे काँग्रेस पडणार एकाकी? मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:23 IST

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

- राजू काळे   

भाईंदर - येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाशिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकमेकांसमोर विरोधात उभे ठाकलेल्या शिवसेनेने भाजपाच्या सबका साथ, सबका विकासाचे सुत्र अवलंबविण्याची शक्यता बळावल्याने काँग्रेस एकाकी पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.

केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने येत्या लोकसभा व विधानसभेत एकला चलो ची भूमिका जाहिर केली होती. यूतीसाठी शिवसेना कोणत्याही पक्षाकडे कटोरा घेऊन जाणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तर युती झाले तर ठिक अन्यथा निवडणुकांत शिवसेनेला पटकण्याची भाषा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वापरली होती. या सर्व भूमिका व भाषांना गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहिर केली. यामुळे २०१७ मधील मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत आता समझोता होणार असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासूनच दिसू लागले होते. तसे अधिकृत विधान शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात केले सुद्धा. यामुळे तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, असा भाईचारा या दोन पक्षांमध्ये मतदारांना दिसून आला. त्यातच या दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहिर झाल्याने  दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांत अधिकृतपणेच दिलजमाई झाल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.पालिका निवडणुकीत भाजपा एक क्रमांकाचा पक्ष ठरल्याने आपसुकच पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर विरोधी पक्षांत शिवसेना वरचढ ठरल्याने हा पक्ष एक क्रमांकाचा विरोधी पक्ष ठरला. शिवसेनेला भाजपाने नेहमी हक्काच्या पदासाठी तसेच आवश्यक दालनासाठी झुलत ठेवून गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांच राजकीय खुन्नस पैदा झाली होती. तर काही विकासकामे अत्यावश्यक असल्याचा दावा करीत भाजपाकडून ती जाणीपुर्वक शिवसेनेच्या बालेकिल्लयात करण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसेनेने विविध माध्यमातून जोरदार विरोध करुन त्या विकासकामांना झुलत ठेवले. जलकुंभ लोकार्पणाचा राडा असो कि शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेने त्याला रोकठोक उत्तर दिले. युतीनंतर मात्र भाजपाई विकासाच्या मनसुब्याला शिवसेना पाठींबा देणार असल्याची चर्चा शहरात तसेच राजकीय वर्तुळात सूरु झाली आहे. यामुळे दुसय््राा क्रमांकाचा विरोधी पक्ष असलेली काँग्रेस मात्र एकाकी पडणार असल्याचे बोलले जात असल्याने या दोन्ही पक्षांना खय््राा अर्थाने अच्छे दिन येऊन शहराचा विकास सबका साथ या धोरणावर होणार असल्याची उपहासात्मक चर्चा सुरू झाली आहे. 

 

भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना पाठींबा नक्कीच देईल. शहराच्या हितासाठी नसलेले तसेच स्वार्थासाठी असलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करेल.

- आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना

युतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर सुद्धा युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज गतीशीलच होईल. 

- चंद्रकांत वैती, उपमहापौर

युती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस मात्र विरोधकांची भूमिका  कायम राहिल. शहराच्या हितासाठी आम्ही सुद्धा कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती हि केवळ आगामी निवडणुकांतील अ‍ॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे. 

- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना