शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 14:18 IST

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते .

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भेडसावणारी पाणी टंचाई हि पालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या काही नेत्यांनी निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे . सोमवार पासून पालिका प्रभाग कार्यालयां बाहेर भाजपा आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना घागर फोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे . 

मीरा भाईंदर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व प्रशासन जबाबदार आहे. तीव्र पाणी टंचाईने लोकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे येत्या सोमवार पासून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या समोर जनतेला घेऊन शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक 'घागर फोडो' आंदोलन सुरु करतील, असे आ. सरनाईक यांनी म्हटले आहे.  

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . जसे पूर्वी केले होते . पण पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी आपल्या सहयोगी विकासकांना व आपल्या स्वत:च्या विकास प्रकल्पाना पाणी पुरवठा भरपूर व्हावा यासाठी संगनमत केले . त्यामुळे आधी पासून राहणाऱ्या मीरा - भाइर्दरकरांचे पाणी नवीन प्रकल्पांना पळवल्या मुळे तसेच हे सर्व विकासक 'रेन वॉटर हार्वेस्टिंगची' योजना राबवत नसल्याने शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होत आहे असा आरोप केला आहे.

भाजपा व त्यांच्या काही नेत्यांनी स्वतःच्या आणि मर्जीतील विकासकांच्या प्रकल्पाना मनमानीपणे पाणी लाटणे , रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना न राबवणे , पाण्याचे ऑडिट न करणे , पाण्याची चोरी व गळती न रोखणे, शहरात स्वतःचा पाण्याचा स्तोत्र सुरु न करणे, तलाव - विहरींच्या पाण्याचा योग्य वापर न करणे, पावसाळी पाण्याचे नियोजन न करणे आदी अनेक कारणांचा पाढाच आ. सरनाईक यांनी वाचून दाखवला . पालिकेत नियमबाह्यपणे तसेच चोरीच्या नळ जोडण्यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

नविन बांधकाम प्रकल्पाना कनेक्शन देऊ नये 

'जोपर्यंत सुर्या प्रकल्पाचे पाणी शहरामध्ये येत नाही तोपर्यंत सर्व नविन बांधकाम प्रकल्पांना दिलेले पाण्याचे कनेक्शन खंडीत करावे व येणा-या नविन विकास प्रकल्पाना पाणी कनेक्शन देऊ नये. तसेच ज्या काही नवीन प्रकल्पांमध्ये नागरिक रहावयास आलेले असतील त्या प्रकल्पातील विकासकांनी तेथील नागरिकांना पाणी पुरवठ्यांची जबाबदारी घेऊन टँकर अथवा अन्य मार्गाने त्या-त्या प्रकल्पांचा पाणी प्रश्न सोडवावा. परंतू आधी पासून राहणाऱ्या नागरिकांचे पाणी नवीन बांधकाम प्रकल्पांना देण्यास शिवसेनेचा ठाम विरोध असल्याचे आ. सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकwater shortageपाणीकपातpratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपा