शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मधील पाणी टंचाईला पालिकेतील सत्ताधारी भाजपा जबाबदार - आ. प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 14:18 IST

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते .

मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भेडसावणारी पाणी टंचाई हि पालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या काही नेत्यांनी निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे . सोमवार पासून पालिका प्रभाग कार्यालयां बाहेर भाजपा आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना घागर फोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे . 

मीरा भाईंदर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व प्रशासन जबाबदार आहे. तीव्र पाणी टंचाईने लोकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे येत्या सोमवार पासून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या समोर जनतेला घेऊन शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक 'घागर फोडो' आंदोलन सुरु करतील, असे आ. सरनाईक यांनी म्हटले आहे.  

शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . जसे पूर्वी केले होते . पण पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी आपल्या सहयोगी विकासकांना व आपल्या स्वत:च्या विकास प्रकल्पाना पाणी पुरवठा भरपूर व्हावा यासाठी संगनमत केले . त्यामुळे आधी पासून राहणाऱ्या मीरा - भाइर्दरकरांचे पाणी नवीन प्रकल्पांना पळवल्या मुळे तसेच हे सर्व विकासक 'रेन वॉटर हार्वेस्टिंगची' योजना राबवत नसल्याने शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होत आहे असा आरोप केला आहे.

भाजपा व त्यांच्या काही नेत्यांनी स्वतःच्या आणि मर्जीतील विकासकांच्या प्रकल्पाना मनमानीपणे पाणी लाटणे , रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना न राबवणे , पाण्याचे ऑडिट न करणे , पाण्याची चोरी व गळती न रोखणे, शहरात स्वतःचा पाण्याचा स्तोत्र सुरु न करणे, तलाव - विहरींच्या पाण्याचा योग्य वापर न करणे, पावसाळी पाण्याचे नियोजन न करणे आदी अनेक कारणांचा पाढाच आ. सरनाईक यांनी वाचून दाखवला . पालिकेत नियमबाह्यपणे तसेच चोरीच्या नळ जोडण्यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

नविन बांधकाम प्रकल्पाना कनेक्शन देऊ नये 

'जोपर्यंत सुर्या प्रकल्पाचे पाणी शहरामध्ये येत नाही तोपर्यंत सर्व नविन बांधकाम प्रकल्पांना दिलेले पाण्याचे कनेक्शन खंडीत करावे व येणा-या नविन विकास प्रकल्पाना पाणी कनेक्शन देऊ नये. तसेच ज्या काही नवीन प्रकल्पांमध्ये नागरिक रहावयास आलेले असतील त्या प्रकल्पातील विकासकांनी तेथील नागरिकांना पाणी पुरवठ्यांची जबाबदारी घेऊन टँकर अथवा अन्य मार्गाने त्या-त्या प्रकल्पांचा पाणी प्रश्न सोडवावा. परंतू आधी पासून राहणाऱ्या नागरिकांचे पाणी नवीन बांधकाम प्रकल्पांना देण्यास शिवसेनेचा ठाम विरोध असल्याचे आ. सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकwater shortageपाणीकपातpratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपा