शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

व्यापारी भरत जैन हत्याप्रकरणी मुख्य सुत्रधाराच्या अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:56 IST

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांचे पोलीस आयुक्तांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येपाठोपाठ सोन्या-चांदीचे व्यापारी भरत जैन यांचीही हत्या करण्यात आली. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी भाजपाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली आहे.

मनसुख हिरेन यांची एप्रिल मध्ये हत्या झाली होती. त्यापाठोपाठ चरईतील व्यापारी भरत जैन यांचीही हत्या झाल्याचे समोर आले. मनसुख यांच्याप्रमाणेच भरत यांचा मृतदेहही कळवा खाडीत टाकण्यात आला होता. या घटनेने ठाण्यातील व्यापाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे. या पाशर््वभूमीवर आमदार डावखरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची सोमवारी भेट घेतली. या वेळी महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेविका तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, जैन समाजाचे प्रतिनिधी तथा व्यापारी अशोक बडाला आणि विकास अच्छा हेही उपस्थित होते.

भरत यांचे १४ ऑगस्ट रोजी अपहरण केले होते. त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने नौपाडा पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यावेळी त्यांना बेपत्ता होण्यास २४ तास झाल्यानंतर तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी भरत यांच्या यांच्या दुकानाचे शटर तुटलेले आढळले. त्याच वेळी भरत यांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव कुटुंबियांना झाली होती. त्यांनी पोलिसांकडेही तातडीने तपास करण्याची मागणी केली होती. दुर्दैवाने, १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह कळवा खाडीत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित तपास भरकटत असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराऐवजी अन्य आरोपींना अटक केल्याचाही गंभीर आरोप या कुटूंबीयांनी केला आहे. तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपाNiranjan Davkhareनिरंजन डावखरेCrime Newsगुन्हेगारी