शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पराभवाच्या भीतीने भाजपची सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी; दोन जागांसाठी शिवसेनेसोबत लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 18:56 IST

उल्हासनगर महापालिकेच्या ९ पैकी ७ विशेष समिती सभापती पद बिनविरोध?, फक्त दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना - भाजप लढत 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका विशेष समिती मध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना पराभवाच्या भीतीने भाजपने सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा शहरात रंगली. ९ पैकी ७ समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बाकी आहे. तर दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना विरुद्ध भाजपचे उमेदवार उभे ठाकले आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या एकून ९ विशेष समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची गुरवारची तारीख होती. विशेष समिती मध्ये ९ पैकी ५ सदस्य भाजपचे असून त्यांचे समितीत स्पष्ट बहुमत आहे. मात्र भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आघाडी सोबत असल्याने भाजपची कोंडी झाली. समिती निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने थेट शिवसेना आघाडी सोबत हातमिळवणी करून आरोग्य समिती व महिला व बालकल्याण अश्या दोन समित्या पदरात पाडून घेतल्याची टीका होत आहे. सार्वजनिक बांधकाम समिती, नियोजन विकास समिती, महसूल समिती अश्या ३ समित्या ओमी टीम समर्थक नागरसेवकांना, शिक्षण समिती शिवसेनेला तर गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला गेली आहे. क्रीडा व समाजकल्याण समिती व पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी शिवसेना व भाजपने परस्पर विरोधात अर्ज दाखल केल्याने, ९ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. 

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने, यापूर्वीच भाजपला चितपट करीत महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापती पद हिसकावून घेतले. तसेच विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीत बहुमत असताना भाजपने माघार घेऊन २ समित्या पदरात पाडून घेतल्या. महापालिका सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून बहुमत असतांना भाजपचा एकापाठोपाठ पराभव होत आहे. भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी सर्वच समिती सभापती पदासाठी पक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आदी सांगितले होते. प्रत्यक्षात भाजपने दोन समिती सभापती पदासाठी शिवसेना आघाडी समोर लोटांगण घेतल्याची टीका होत आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सभापती पदाची निवडणूक होऊ नये म्हणून भाजपला दोन समित्या सोडल्याची प्रतिक्रिया दिली. 

भाजप शहराध्यक्ष पुरस्वानीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे

महापालिकेसह विशेष समिती मध्ये स्पष्ट बहुमत असतांना, विशेष समिती सभापती पदाच्या निवडणूकित माघार का? असा प्रश्न पक्षातून विचारला जात आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाल्यानंतर, पक्षाचे महापालिकेत बहुमत असतांना पराभवाचे धक्के एकापाठोपाठ बसत आहे. आतातर विशेष समिती मध्ये बहुमत असतांना पक्षाने, थेट सत्ताधाऱ्यासमोर लोटांगण घालत पराभवाच्या भीतीने दोन समित्या पदरात पाडून घेतल्याचा आरोप होत आहे. एकुणच पुरस्वानी हटाव पक्ष बचाव असा नारा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा