शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

Maharashtra Election 2019: भाजप, अपक्ष उमेदवारामध्ये रंगणार अटीतटीची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:43 IST

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, भाजपचे नरेंद्र मेहता व अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्यात तिरंगी लढत आहे. तिघेही मातब्बर उमेदवार आहेत.

- धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, भाजपचे नरेंद्र मेहता व अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्यात तिरंगी लढत आहे. तिघेही मातब्बर उमेदवार आहेत. परंतु, या मतदारसंघात लढतीची चर्चा आहे ती जैन व मेहता यांच्यातली.

उमेदवारी मिळवण्यासाठी जैन व मेहतांमध्ये जोरदार चुरस होती. पण, मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा करून त्यांची उमेदवारी मिळवली. तर, उमेदवारी न मिळाल्याने जैन यांनी अपेक्षेप्रमाणे बंडखोरी केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत मेहता हे निवडून आले. त्यांनी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला होता. काँग्रेसची संघटना पूर्वीसारखी शहरात बळकट नसली, तरी मुझफ्फर हे नगर परिषद काळापासून राजकारणात व समाजकारणात आहेत.

शहराच्या आजपर्यंतच्या विकासात व योजनांमध्ये मुझफ्फर यांचे योगदान नाकारून चालणार नाही. शहरातील राजकारणाचा आणि समस्यांचा त्यांचा अभ्यास आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे. राज्यातील ज्या काही निकालांकडे लक्ष लागले आहे, त्याच या मतदारसंघाचा निश्चितच समावेश आहे, असे राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात आले.

जमेच्या बाजू

मतदारसंघात भाजपचे ४२ नगरसेवक आहेत. शिवाय शिवसेना, काँग्रेस व काँग्रेस समर्थक प्रत्येकी एक असे तीन नगरसेवक सोबत आहेत. भाजपची संघटना असून पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. मतदारनोंदणीपासून पक्षबांधणी तसेच विधानसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव, नियोजन आहे. स्थानिक पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारीच नव्हे, तर महापालिका, पोलीस, महसूल आदी विभागांवर चांगली पकड आहे.

माजी महापौर असतानाच्या त्यांच्या कारकिर्दीत ७५ दशलक्ष लीटरची पाणीपुरवठा योजना सुरू होऊन शहरातील नागरिकांना नवीन नळजोडण्या देण्याची सुरूवात झाली. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी जैन या महापौर असताना त्यांच्या मागणीवरून पालिका कार्यक्रमात केली होती. आरोप वा वादात नसणाऱ्या जैन यांची नागरिकांमध्ये व्यक्तिगत प्रतिमा चांगली आहे. महिलांसाठी उपक्रम राबविले.

उणे बाजू

शिवसेना आणि स्थानिक नेते, नगरसेवकांशी सतत घेतलेला पंगा, दाखल असलेले २१ फौजदारी गुन्हे, लोकायुक्तांनी चालवलेली बेनामी संपत्ती प्रकरणातील चौकशी, आरक्षणांचा गैरवापर, टीडीआर व यूएलसी गैरप्रकाराच्या तक्रारी, सेव्हन इलेव्हन कंपनीच्या माध्यमातून घेतलेली आर्थिक भरारी आदी कारणांनी मेहता वादाच्या भोवºयात राहिले आहेत. मर्जीप्रमाणे कामकाज करतात. २०१४ मधील आश्वासनांची पूर्तता केली नाही.

नागरिकांमध्ये चांगली चर्चा असली, तरी निवडणुकीसाठी लागणारे पक्ष संघटन नाही. त्यामुळे मतदार याद्यांपासून चांगले पोलिंग एजंट नियुक्त करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार. बॅट हे चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि मतदानयंत्रांवर असलेले स्थान सांगण्यासाठी घराघरांत पोहोचण्याची गरज आहे. सत्ताधारी भाजप उमेदवारासमोर बंडखोरी केल्याने प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या तक्रारींवर सहकार्य करतील, याची साशंकता आहे.

टॅग्स :mira-bhayandar-acमीरा-भाईंदरBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019