शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पालघरमध्येही बर्ड फ्लू? वसईच्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मृत, नमुने पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 8:28 AM

मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

पालघर : जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममधील २० ते ३० कोंबड्या मागील ५-६ दिवसांपासून मृत्युमुखी पडत असल्याचे समोर आले आहे. या पोल्ट्री फार्ममधील मृत कोंबड्या तपासणीसाठी पुणे आणि नंतर तेथून भोपाळ येथील सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील पाषाणे गावातील एका पोल्ट्री फार्ममधील शेकडो कोंबड्या अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्याची बाब उघड झाल्यानंतर, या मृत कोंबड्या तपासणीसाठी भोपाळ येथील सुरक्षा पशुधन संस्थेकडे पाठविण्यात आल्या होत्या. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या पोल्ट्री फार्ममधील एक हजार कोंबड्या नष्ट करीत परिसरातील एक किलोमीटर क्षेत्रातील सर्वच कुक्कुटवर्गीय पक्षी नष्ट करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित प्रशासन विभागाला दिले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्याला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यानंतर ही बर्ड फ्लूची लाट पालघरमध्ये शिरकाव करते की काय? अशी भीती पोल्ट्री फार्मधारक आणि चिकन विक्रेते दुकानांमध्ये आहे. दरम्यान, मागील पाच ते सहा दिवसापासून वसई तालुक्यातील आगाशी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज २० ते ३० पक्षी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडत असल्याची बाब समोर आली होती.

यानंतर त्या मृत कोंबड्यांचे नमुने प्राणी रोग तपासणी विभाग पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ते  आता अधिक तपासासाठी सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळकडे पाठविण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात याचा अहवाल येण्याचे अपेक्षित असल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. कांबळे यांनी लोकमतला दिली.

कृती आराखडाही तयार - डॉ. कांबळेभोपाळ येथून या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास शासनाच्या मानक कार्य पद्धतीनुसार पुढील कार्यवाहीसाठी आम्ही तयार आहोत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरआरपी (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली असून, आमचा कृती आराखडाही पुढील कारवाईसाठी तयार करण्यात आल्याचे  पशुधन संशोधन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. कांबळे यांनी सांगितले. भोपाळहून नेमका काय अहवाल येतो याकडे अधिकारी, व्यावसायिक यांचे लक्ष लागले आहे. जर बर्ड फ्लू निष्पन्न झाल्यास परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू