शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

दहा टक्के कोट्यातील १२०० घरांच्या कोट्यवधीच्या भाड्यावर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 02:07 IST

डीपीसीची बैठक नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

- सुरेश लोखंडेठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) कार्यक्षेत्रातील शेकडो बिल्डरांकडून १० टक्के कोट्यातून मिळणारी घरे महापालिकेने अजूनही ताब्यात घेतलेली नाहीत. कल्याण पूर्वेत जवळजवळ ११५० ते १२०० घरे १० टक्के कोट्यातून मिळालेली आहेत. मात्र, या घरांंंंचा ताबा अजूनही महापालिकेने घेतलेला नाही. मग, १० वर्षांपासून या घरांचे भाडे कोण खात आहे, असा गंभीर आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.डीपीसीची बैठक नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तीत विविध गोपनीय विषय हाताळण्यात आले. यामध्ये केडीएमसीच्या कार्यक्षेत्रातील १० टक्के घरांचा विषय गायकवाड यांनी उघड करून प्रशासन, विकासक यांच्यातील व्यवहारावर ताशेरे ओढले. केडीएमसीच्या कार्यक्षेत्रात शेकडो विकासकांचे प्रकल्प सुरू आहेत. या विकासकांकडून १० टक्के कोट्यातून महापालिकेला काही घरे दिली जातात. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात या १० टक्के घरांची संख्या मोठी असू शकते. यातील केवळ कल्याण पूर्वेतील १० टक्के घरांचा विषय त्यांनी सभागृहात लावून धरला.विकासकांकडून त्यांच्या प्रकल्पातील १० टक्के घरे महापालिकेसाठी राखीव ठेवली जातात. महापालिकेने ती ताब्यात घेऊन पुनर्वसनाच्या समस्या दूर करण्याची अपेक्षा आहे. या घरांबाबत गायकवाड यांनी केवळ त्यांच्या कल्याण पूर्वेच्या कार्यक्षेत्रातील विषय सभागृहात उघड केला असता तब्बल ११५० ते १२०० घरे १० टक्केतून महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे. ही एक हजार २०० घरे ताब्यात घेऊन शहरातील पुनर्वसनाची समस्या सोडवणे शक्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. या घरांचे भाडे १० वर्षांपासून कोणकोण खात आहे, ते उघड करा. बिल्डर खात आहे की, त्यांच्या माध्यमातून अधिकारी भाडे घेत आहेत, असा प्रश्न करून गायकवाड यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली.बीएसयूपीच्या ८०० घरांची दयनीय अवस्थाया १० टक्के घरांच्या गोपनीयतेने जाणकारांच्या भुवया उंचावल्या. यावर काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, केडीएमसीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने उभे राहून उत्तर देणे टाळले. यानंतर मात्र हा विषय शहरातील बाधित कुटुंंबीयांकडे वळला आणि १० टक्के कोट्यातील घरांच्या भाडे खाण्याचा विषय दबला. या विषयाच्या प्रारंभी केडीएमसीमधील बीएसयूपीच्या घरांचा विषय गायकवाड यांनी हाताळला. सुमारे ८०० घरे बांधून तयार झाली. त्यात लाइट, पाणी सुविधा उपलब्ध होऊनही ती वाटप झाली नाही. ती आता नादुरुस्त झाली. त्यांची दारे, खिडक्या लोकांनी काढून नेल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. या विषयाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करून या बीएसयूपीच्या घरांबाबत लवकरच मंत्रालयात मीटिंग लावण्याच्या सूचना केल्या.रेल्वेबाधितांच्या समस्येवर चर्चाखासदार श्रीकांत शिंदे यांनीदेखील केडीएमसीच्या कार्यक्षेत्रातील रेल्वेच्या कामामुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी रेल्वे ८०० घरे देत आहे. या प्रत्येक घरासाठी रेल्वे सात लाख रुपये महापालिकेच्या खात्यावर जमा करणार आहे. पण, आता त्यांनी हा निर्णय बदलवून ते सात लाख रुपये राज्य शासनाकडे देण्याचा निर्णय घेतल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पॉलिसी तयार करून प्रत्येक घरासाठी मिळणारे सात लाख रुपये महापालिकेच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यातून लोकांना त्वरित घरे खरेदी करून देता येतील. रेल्वेच्या या रोड वाइंडिंगसाठी अधिकारी गेले असता लोक आधीच्या घरांविषयी विचारणा करतात. ती घरे आधी द्या, अशी मागणी करून ते कामास विरोध करीत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. या विषयावरील चर्चेत पालकमंत्र्यांसह आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींनी सहभाग घेऊन प्रकल्पबाधित कुटुंबीयांच्या घरांविषयी डीपीसीत सकारात्मक चर्चा केली. या चर्चेच्या सकारात्मक धोरणामुळे प्रकल्पबाधितांचे लवकरच योग्य ठिकाणी पुनर्वसन होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :kalyanकल्याण