शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 7:01 PM

Loksabha Election 2024; भिवंडीत शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना शिवसैनिकांनी विरोध केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने ही जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी मुरबाड, वाडा, शहापूर, कल्याण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडीची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी सांगितले.

गेल्या दोन निवडणुकीत शिवसैनिकांनी भाजपचे खासदार कपिल पाटील यांना निवडून दिले आहे. मुरबाड, भिवंडी, वाडा, शहापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये खासदार कपिल पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी आहे. निवडणूक झाली की खासदार पाटील शिवसैनिकांना बाजूला करतात. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळतो. निवडणुकीत युती धर्म पाळतो. मात्र खासदारांनी मागील १० वर्ष आम्हाला विश्वासात घेतले नाही अशी खदखद यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. 

‘भिवंडी मतदारसंघात शिवसेनेच्या जीवावर मी खासदार झालोय’, हे कपिल पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढला. भिवंडी मतदार संघात २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळून कपिल पाटील यांच्या विजयासाठी काम केले. मात्र निवडून आल्यानंतर खासदारांनी इथल्या शिवसैनिकांची कामे केली नाही. विकास निधी दिला नाही. याउलट शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचं मारुती धिर्डे यांनी सांगितले. मागील दोनवेळा विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व आणि शहापूरमधील शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यात आला. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या मनात खासदार कपिल पाटील यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. खासदार कपिल पाटील यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे शिवसेनेने भिवंडी निवडणूक लढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या नेत्यांकडे प्रयत्न करावा, भिवंडी लोकसभा मिळवून घ्यावी आमचा त्यांना विरोध आहे का? निर्णय करणारा मी नाही. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून ही उमेदवारी जाहीर केली. चर्चा करून निर्णय घेतला आहे. आता जर शिवसैनिकांना वाटत असेल त्यांनी लढावं तर गैर काही नाही. जी काही नाराजी आहे ती वरिष्ठांकडे मांडावी किंवा माझ्याशी बोलावं. कालपर्यंत धिर्डे आमच्या प्रचाराला फिरत होते. संवाद मेळावा घेतला त्यातही ते होते. नाराजी असती तर मेळाव्याला आले नसते. मागच्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेने पुढाकार घेऊन काम केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द प्रमाण मानून ते पुन्हा कामाला लागतील असा विश्वास भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बोलून दाखवला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhiwandi-pcभिवंडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४