शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 19:03 IST

Loksabha Election 2024; भिवंडीत शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना शिवसैनिकांनी विरोध केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने ही जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी मुरबाड, वाडा, शहापूर, कल्याण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भिवंडीची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी सांगितले.

गेल्या दोन निवडणुकीत शिवसैनिकांनी भाजपचे खासदार कपिल पाटील यांना निवडून दिले आहे. मुरबाड, भिवंडी, वाडा, शहापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये खासदार कपिल पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी आहे. निवडणूक झाली की खासदार पाटील शिवसैनिकांना बाजूला करतात. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळतो. निवडणुकीत युती धर्म पाळतो. मात्र खासदारांनी मागील १० वर्ष आम्हाला विश्वासात घेतले नाही अशी खदखद यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. 

‘भिवंडी मतदारसंघात शिवसेनेच्या जीवावर मी खासदार झालोय’, हे कपिल पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष ठाणे जिल्ह्यात वाढला. भिवंडी मतदार संघात २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसैनिकांनी युतीचा धर्म पाळून कपिल पाटील यांच्या विजयासाठी काम केले. मात्र निवडून आल्यानंतर खासदारांनी इथल्या शिवसैनिकांची कामे केली नाही. विकास निधी दिला नाही. याउलट शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचं मारुती धिर्डे यांनी सांगितले. मागील दोनवेळा विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व आणि शहापूरमधील शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्यात आला. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या मनात खासदार कपिल पाटील यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. खासदार कपिल पाटील यांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे शिवसेनेने भिवंडी निवडणूक लढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी त्यांच्या नेत्यांकडे प्रयत्न करावा, भिवंडी लोकसभा मिळवून घ्यावी आमचा त्यांना विरोध आहे का? निर्णय करणारा मी नाही. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून ही उमेदवारी जाहीर केली. चर्चा करून निर्णय घेतला आहे. आता जर शिवसैनिकांना वाटत असेल त्यांनी लढावं तर गैर काही नाही. जी काही नाराजी आहे ती वरिष्ठांकडे मांडावी किंवा माझ्याशी बोलावं. कालपर्यंत धिर्डे आमच्या प्रचाराला फिरत होते. संवाद मेळावा घेतला त्यातही ते होते. नाराजी असती तर मेळाव्याला आले नसते. मागच्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेने पुढाकार घेऊन काम केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द प्रमाण मानून ते पुन्हा कामाला लागतील असा विश्वास भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बोलून दाखवला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhiwandi-pcभिवंडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४