शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या चार, मालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 12:19 IST

भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर  9 जण जखमी झाले आहेत.

भिवंडी : भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर  9 जण जखमी झाले आहेत. ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, इमारतीचा मालक महमद ताहीर रफीक बिजनोर (49) याला पोलिसांनी अटक केली आहे.

रुख्सार याकूब खान (18), अश्फाक मुश्ताक खान (38), जैबुन्निसा रफीक अन्सारी (61) व शिनाख्त परवीन खान (65 )अशी मृतांची नावे आहेत. रुख्सार आपल्या कुटुंबासह या इमारतीत राहत होती, तर एकूण नऊ जखमींपैकी ख्वाजा मोहम्मद सय्यद (55), रेहान खान (6), सलमा ताहीर अन्सारी (55), आबीद याकूब खान (21), आसीफ याकूब खान (21) हे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर शकील अल्लादीया अन्सारी (37), याकूब युसूफ खान (58) साबीरा याकूब पठाण (45) व इमराना खान (22) यांच्यावर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजूबाजूला दाट वस्ती असल्याने, बचावकार्य करणा-या कर्मचा-यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. त्यात बघ्यांची गर्दी होती. पाच वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या या इमारतीची माहिती प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांच्याकडे उपलब्ध नव्हती. आपण काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्याचे सांगत, जबाबदारी त्यांनी झटकून टाकली. घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, महापौर जावेद दळवी, आमदार महेश चौघुले, रूपेश म्हात्रे, उपमहापौर मनोज काटेकर, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, तहसीलदार शशिकांत गायकवाड, उपायुक्त विनोद शिंगटे यांनी भेट देऊन, जखमी व मृतांच्या नातेवाइकांची विचारपूस केली.

क्लस्टर योजना राबविण्याची सूचनापालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून, ठाण्याच्या धर्तीवर तेथे क्लस्टर योजना राबविण्यासाठी पालिका अधिकाºयांना सांगितले, तर खासदार कपिल पाटील यांनीही क्लस्टर योजना राबविण्याच्या सूचना अधिकाºयांना केल्या.नवी वस्तीमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या शेजारी पाच वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेवर ताहीरने चार मजल्यांची इमारत बांधली होती. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक यानुसार चार कुटुंबे राहत होती, तसेच गच्चीवरही काही कुटुंबे राहत होती.तीन कुटुंबे बाहेर गेल्याने मोठी प्राणहानी टळली. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास इमारतीला अचानक भेगा पडून जोरदार आवाज होत ती कोसळली. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, पोलीस तातडीने दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या ४० जवानांनी बचावकार्य सुरू केले. ढिगा-याखालून सात जणांना बाहेर काढले. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडीthaneठाणेDeathमृत्यू