शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘बारवी’ प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:30 IST

मुरबाड : ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या ...

मुरबाड : ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या १७४ व्यक्तींना शासकीय सेवेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या उंचीवाढीमुळे धरणातील पाणीसाठा दुप्पट होणार आहे.

कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, मीरा - भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, नवीमुंबईचा काही भाग, मुरबाड आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया मुरबाड तालुक्यातील बारवी नदीवरील बारवी धरणाचे पाणी वाढत्या लोकसंख्येला अपूरे पडू लागले. या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि उंची वाढीचे काम पूर्णत्त्वास आले देखील. मात्र, यामुळे तोंडली, काचकोली, मोहघर आदी गावपाड्यांमधील अनेक शेतकºयांच्या जमिनी बाधित झाल्या.

प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असून ठाणे जिल्हा नियोजन समितीने प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सुमारे १९१ नावांपैकी १७४ व्यक्तींची नावे अंतिम करण्यात आली आहेत. याबद्दल हरकती तसेच सूचना मागवण्यात आल्या आहेत. एका कुटुंबाचे चार भाग झाल्याचे दाखवून प्रत्येकी एकाला नोकरी मिळावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. परंतु, त्यास नकार देऊन कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती सांगेल त्याला नोकरी देण्यात येणार आहे. अशा प्रकारची १७४ नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.कोळे गावातील जमीन ही वनखात्याची असून ती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या गावातील पुनर्वसन अद्याप रखडले आहे. तर तोंडली येथील गावकºयांनी जमिनीच्या मोबदल्यात रोख पैशांची मागणी केली असून त्या बाबतचा निर्णय या महिना अखेरीस होणाºया बोर्ड मिटींगमध्ये होण्याची अपेक्षा आहे. सासणे गावाजवळ पुनर्वसन करण्यासाठी शेडचे कामही प्रगती पथावर आहे.

बारवी धरणीची उंची वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून वक्र दरवाजेही आले आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय दरवाजे बसवता येत नाही.धरणाची ऊंची ३ मीटरने वाढवण्यात आल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांनी वाढला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा दुप्पट होणार आहे. त्याच प्रमाणे वीजनिर्मिती करणे देखील शक्य होणार आहे.