शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बारवीचे दरवाजे बंद; जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:10 IST

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली चाचणी

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर त्या धरणात अजूनही क्षमतेएवढे पाणी साठवण्यात आले नव्हते. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने दरवाजांचे काम रखडले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने आता बारवी धरणाचे दरवाजे हे या वर्षात बंद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या दरवाजांची चाचणी आमदार किसन कथोरे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावरील बारवी धरण हे एमआयडीसीच्या अखत्यारितील धरण असून या धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची नऊ मीटरने वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा राहणार आहे. धरणाच्या उंचीच्या वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, धरणात क्षमतेएवढे पाणी साठवणे अवघड जात होते. धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील गावांनी स्थलांतराला विरोध केला होता.पुनर्वसन पॅकेज, नोकरी आणि घरांच्या मोबदल्यात भरपाई या विषयांवर सातत्याने वाद सुरू होता. आता एमआयडीसीनेही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून धरणाची उंची नऊ मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र, गेल्या वर्षभरात शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली आहेत.३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणारयंदा धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यासाठी ११ दरवाजे बंद करण्यात येणार आहे. मात्र, धरण भरल्यावर हे दरवाजे उघडता यावे, यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. हे दरवाजे स्वयंचलित असून वेळेवर हायड्रोलिक पद्धतीचाही अवलंब करता येणार आहे. या चाचणीत दरवाजांची उघडझाप पडताळण्यात आली. यावेळी आमदार कथोरे यांनीही यंत्रणेची माहिती घेतली. यंदाच्या वर्षात दरवाजे बंद करून धरणात साठा निर्माण केला जाणार आहे.

टॅग्स :Damधरण