शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

बारवीचे दरवाजे बंद; जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:10 IST

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली चाचणी

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर त्या धरणात अजूनही क्षमतेएवढे पाणी साठवण्यात आले नव्हते. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने दरवाजांचे काम रखडले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने आता बारवी धरणाचे दरवाजे हे या वर्षात बंद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या दरवाजांची चाचणी आमदार किसन कथोरे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावरील बारवी धरण हे एमआयडीसीच्या अखत्यारितील धरण असून या धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची नऊ मीटरने वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा राहणार आहे. धरणाच्या उंचीच्या वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, धरणात क्षमतेएवढे पाणी साठवणे अवघड जात होते. धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील गावांनी स्थलांतराला विरोध केला होता.पुनर्वसन पॅकेज, नोकरी आणि घरांच्या मोबदल्यात भरपाई या विषयांवर सातत्याने वाद सुरू होता. आता एमआयडीसीनेही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून धरणाची उंची नऊ मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र, गेल्या वर्षभरात शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली आहेत.३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणारयंदा धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यासाठी ११ दरवाजे बंद करण्यात येणार आहे. मात्र, धरण भरल्यावर हे दरवाजे उघडता यावे, यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. हे दरवाजे स्वयंचलित असून वेळेवर हायड्रोलिक पद्धतीचाही अवलंब करता येणार आहे. या चाचणीत दरवाजांची उघडझाप पडताळण्यात आली. यावेळी आमदार कथोरे यांनीही यंत्रणेची माहिती घेतली. यंदाच्या वर्षात दरवाजे बंद करून धरणात साठा निर्माण केला जाणार आहे.

टॅग्स :Damधरण