शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 06:00 IST

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात १४४ (२) अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. १५ ते १९ मे दरम्यान कुठेही फिरकू नका, असे सांगितले जात आहे. ज्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशांनाही नोटीस बजावण्याचे कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केला. 

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, त्या आधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही आव्हाड म्हणाले. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की, निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात. त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीस बजावलेल्या नाहीत. विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाही, याकरिता प्रयत्न असून पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही आव्हाड म्हणाले.

ज्याला नोटीस बजावण्यात आली, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा, असा सवालही आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४