शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 06:00 IST

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात १४४ (२) अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. १५ ते १९ मे दरम्यान कुठेही फिरकू नका, असे सांगितले जात आहे. ज्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशांनाही नोटीस बजावण्याचे कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केला. 

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, त्या आधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही आव्हाड म्हणाले. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की, निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात. त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीस बजावलेल्या नाहीत. विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाही, याकरिता प्रयत्न असून पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही आव्हाड म्हणाले.

ज्याला नोटीस बजावण्यात आली, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा, असा सवालही आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४