शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:11 IST

बदलापूरमध्ये पाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर झालेली नाही.

बदलापूर : बदलापूरमध्येपाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपने बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.गुरु वारी बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कूळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाला असून धरणे भरली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, सानेवाडी, रमेशवाडी आदी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे महिलांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागत आहे. तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आपण हे आंदोलन केल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. पाणीटंचाईचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जांभूळ येथील फिल्टरेशन प्लांटमधून ५ एमएलडी पाणी उचलण्याचा सोपा मार्ग आहे.२००५ च्या महापुरानंतर बॅरेज धरण वाहून गेले. त्या वेळी या प्लान्टमधून बदलापूरसाठी पाणी घेण्यात आले होते. त्यासाठी वाहिनीचीही जोडणी केलेली होती. फक्त व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घ्यायचे होते, मात्र तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही स्वस्थ बसणार नाहीयासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांश्ी चर्चा करण्यात आली असून त्यांनी लवकरच पाणीसमस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले तरी पाणी समस्या दूर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर