शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:11 IST

बदलापूरमध्ये पाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर झालेली नाही.

बदलापूर : बदलापूरमध्येपाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपने बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.गुरु वारी बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कूळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाला असून धरणे भरली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, सानेवाडी, रमेशवाडी आदी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे महिलांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागत आहे. तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आपण हे आंदोलन केल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. पाणीटंचाईचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जांभूळ येथील फिल्टरेशन प्लांटमधून ५ एमएलडी पाणी उचलण्याचा सोपा मार्ग आहे.२००५ च्या महापुरानंतर बॅरेज धरण वाहून गेले. त्या वेळी या प्लान्टमधून बदलापूरसाठी पाणी घेण्यात आले होते. त्यासाठी वाहिनीचीही जोडणी केलेली होती. फक्त व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घ्यायचे होते, मात्र तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही स्वस्थ बसणार नाहीयासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांश्ी चर्चा करण्यात आली असून त्यांनी लवकरच पाणीसमस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले तरी पाणी समस्या दूर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर