शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे, पाणीटंचाईने बदलापूरकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:11 IST

बदलापूरमध्ये पाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर झालेली नाही.

बदलापूर : बदलापूरमध्येपाणीसमस्या कायम असून याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपने बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.गुरु वारी बदलापूर पश्चिम येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कूळगाव बदलापूर नगरपालिकेतील भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंदा चांगला पाऊस झाला असून धरणे भरली आहेत. बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा, सानेवाडी, रमेशवाडी आदी भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या दुष्काळग्रस्त भागाप्रमाणे महिलांना कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागत आहे. तर पिण्यासाठी बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलनाचा इशारा देऊनही समस्या दूर करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह आपण हे आंदोलन केल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. पाणीटंचाईचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जांभूळ येथील फिल्टरेशन प्लांटमधून ५ एमएलडी पाणी उचलण्याचा सोपा मार्ग आहे.२००५ च्या महापुरानंतर बॅरेज धरण वाहून गेले. त्या वेळी या प्लान्टमधून बदलापूरसाठी पाणी घेण्यात आले होते. त्यासाठी वाहिनीचीही जोडणी केलेली होती. फक्त व्हॉल्व्ह सुरू करून पाणी घ्यायचे होते, मात्र तेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही स्वस्थ बसणार नाहीयासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांश्ी चर्चा करण्यात आली असून त्यांनी लवकरच पाणीसमस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असले तरी पाणी समस्या दूर होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर