शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अयोध्या राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम; हिंदू बांधव पेढे वाटून करणार आनंद साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 7:52 PM

या  कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नितीन पंडित

भिवंडी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर पायाभरणी कार्यक्रम बुधवारी 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत शहरात हिंदू बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भावना येथील मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या  कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भिवंडी शहर हे संवेदनशील शहर म्हणून देहभर ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून सर्वधर्म समभाव व जातीय सलोख्याची भावना येथील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये रुजल्याने शहराची ही संवेदनशील म्हणून असलेली ओळख हळूहळू पुसू लागली आहे. मात्र मागील काही जातीय दंगलींचा इतिहास या शहराला असल्यामुळे तसेच शहरात मुस्लिम बांधवांची संख्या देखील जास्त असल्याने या शहराकडे आजही अतिसंवेदनशील शहर म्हणूनच पहिले जात आहे. त्यामुळे धार्मिक सण उत्सवांमध्ये शहरात पोलीस यंत्रणा नेहमीच सतर्क असते.

बुधवारी अयोध्या येथील राम मंदिराच्या पाया भरणीचा कार्यक्रम होणार आहे. श्रीराम हे समस्त हिंदू बांधवांचे दैवत आहेत, त्यातच मागील अनेक वर्षांपासून या राम मंदिराच्या निर्माणाचा निर्णय प्रलंबित असल्याने हिंदू बांधवांमध्ये सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांबाबत नाराजी होती. आता राम मंदिर उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने हिंदू बांधव या पायाभरणीच्या दिवशी शहरात पेढे वाटून, घरी दिवे लावून व ध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त करणार आहेत. सध्या देशभर कोरोनाचे संकट असल्याने हिंदू बांधव आपल्या घरीच हा आनंदोत्सव साजरा करणार आहेत.मात्र जर कोरोना संकट नसते तर या उत्सवासाठी आयोध्यात हिंदू बांधवांनी एकच गर्दी केली असती अशी भावना काही हिंदू बांधवांनी व्यक्त केली आहे. तर पायाभरणी नंतरही या मंदिराच्या निर्माणात कोणतेही राजकारण न करता भव्य असे राम मंदिर लवकरात लवकर निर्माण करावे अशीही प्रतिक्रिया काही हिंदू बांधवांनी दिली आहे. दुसरीकडे शहरातील अनेक मुस्लिम बांधवांना बुधवारी होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाबाबत माहिती देखील नाही. तर काहींनी पूर्वी मुस्लिम बांधवांमध्ये अशिक्षितपणा व जनजागृतीचा अभाव असल्याने दंगलीसारख्या घटना घडत होत्या.आता शहरात तशी परिस्थिती राहिली नसून हिंदू बांधव ईदमध्ये सहभागी होत आहेत तर हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी होत असल्याने कट्टरतावाद कमी झाला असून लोकांमध्ये सामाजिक जाणिव निर्माण झाली असल्याने आयोध्यातील राम मंदिर निर्माणा विषयी मुस्लिम बांधव आता कोणतीही जहाल प्रतिक्रिया देत नाहीत. तर काही मुस्लिम बांधवांनी आम्ही या देशाचे नागरिक असून देशावर व देशातील संविधानावर प्रेम करतो व त्याचा आदर करतो , त्यातच राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असल्याने आपल्या भावना व्यक्त करण्यात आता अर्थ नाही कारण सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्थानी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा व संविधानाचा मान राखणे आपले आद्य कर्तव्य आहे त्यामुळे राम मंदिराच्या निर्णयाचे मुस्लिम बांधव म्हणून आपण स्वागत व समर्थन करणारच अशी प्रतिक्रिया देखील अनेक मुस्लिम बांधवांनी दिली आहे. 

दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी शहरातील सहाही पोलीस ठाण्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एसआरपीएफची एक तुकडी व वाहतूक शाखेचे शंभर पोलीस शहरात तैनात करण्यात आले आहेत मात्र सध्या शहरात शांतता असून नागरिकांमध्ये सामंजस्याची व सहकार्याची भावना आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.