शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

आव्हाडांनी मागितली ठाणेकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:29 IST

शिवसेनेच्या अपयशावर केली टीका; पाणीटंचाईवरही ओडले आसूड

ठाणे : ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असतानाही सत्ताधारी शिवसेनेला वाहतूककोंडी सोडवता आली नाही. त्याचा फटका मंगळवारी त्यांचेच नेते उद्धव ठाकरे यांना बसला. यामुळे ते यावर बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी साधा ब्र सुद्धा उच्चारला नाही, त्यामुळे मी तमाम ठाणेकरांसह त्यांचीही सत्ताधाऱ्यांच्या वतीने जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली.मंगळवारी ठाण्यात ठाकरे यांची सभा झाल्यानंतर बुधवारी आव्हाडांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. उद्धव यांना ठाण्यात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर झाला. कारण, त्यांना शीळफाटा येथील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बाळासाहेबांचे पुत्र असतानाही त्यांनी याबाबत जराही चक्कार शब्द काढला नाही. त्यामुळे आता त्यांनाच कळून चुकले असेल की, आपली ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असूनही आपण काय केले. ठाणे ते घोडबंदर या प्रवासासाठी एक ते दीड तास खर्च होतो, तर शीळफाटा ते ठाणे या प्रवासात दोन ते अडीच तास वाया जातात. परंतु, यावर उपाय करण्याऐवजी उद्धव यांनी आपले तोंड बंद ठेवण्याचे काम केले. त्यामुळे ठाणेकरांचे जे काही हाल होत आहेत, त्यासाठी मी त्यांच्यासह ठाणेकरांची जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.तसेच ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचेसुद्धा त्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे. परंतु, आता हा ठाणेकर आपल्या अशा आश्वासनांना भुलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सैनिकांच्या शौर्यावर आपण केव्हाही शंका उपस्थित केली नाही. उलट, उद्धव यांनीच चौकीदारावर संशय व्यक्त केल्याचे आव्हाड म्हणाले. ठाणेकरांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.नको तिथे उधळपट्टीपाण्याचे नियोजन कोलमडून पडले आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी साधे धरण ठाणेकरांना देऊ केले नाही. याउलट, नको त्या प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना