शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आव्हाडांनी मागितली ठाणेकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:29 IST

शिवसेनेच्या अपयशावर केली टीका; पाणीटंचाईवरही ओडले आसूड

ठाणे : ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असतानाही सत्ताधारी शिवसेनेला वाहतूककोंडी सोडवता आली नाही. त्याचा फटका मंगळवारी त्यांचेच नेते उद्धव ठाकरे यांना बसला. यामुळे ते यावर बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी साधा ब्र सुद्धा उच्चारला नाही, त्यामुळे मी तमाम ठाणेकरांसह त्यांचीही सत्ताधाऱ्यांच्या वतीने जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली.मंगळवारी ठाण्यात ठाकरे यांची सभा झाल्यानंतर बुधवारी आव्हाडांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. उद्धव यांना ठाण्यात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर झाला. कारण, त्यांना शीळफाटा येथील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बाळासाहेबांचे पुत्र असतानाही त्यांनी याबाबत जराही चक्कार शब्द काढला नाही. त्यामुळे आता त्यांनाच कळून चुकले असेल की, आपली ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असूनही आपण काय केले. ठाणे ते घोडबंदर या प्रवासासाठी एक ते दीड तास खर्च होतो, तर शीळफाटा ते ठाणे या प्रवासात दोन ते अडीच तास वाया जातात. परंतु, यावर उपाय करण्याऐवजी उद्धव यांनी आपले तोंड बंद ठेवण्याचे काम केले. त्यामुळे ठाणेकरांचे जे काही हाल होत आहेत, त्यासाठी मी त्यांच्यासह ठाणेकरांची जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.तसेच ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचेसुद्धा त्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे. परंतु, आता हा ठाणेकर आपल्या अशा आश्वासनांना भुलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सैनिकांच्या शौर्यावर आपण केव्हाही शंका उपस्थित केली नाही. उलट, उद्धव यांनीच चौकीदारावर संशय व्यक्त केल्याचे आव्हाड म्हणाले. ठाणेकरांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.नको तिथे उधळपट्टीपाण्याचे नियोजन कोलमडून पडले आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी साधे धरण ठाणेकरांना देऊ केले नाही. याउलट, नको त्या प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना