शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:11 IST

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा सन २०२० - २१ च्या अर्थसंकल्प १२६५ कोटी ८६ लाखां पर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपाने मात्र सन २०२१ - २०२२ सालचा अर्थसंकल्प मात्र तब्बल २११२ कोटींचा मंजूर केला आहे . प्रशासनाने सादर केलेल्या १५०९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे . सत्ताधाऱ्यांनी महसुली उत्पन्न पेक्षा अर्थसंकल्प अव्वाच्या सव्वा फुगवला असतानाच दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने स्थायी समितीच्या आकडेवारीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेचा २०२१ - २०२२ सालचा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थायी समितीला सादर केला होता . तो अर्थसंकल्प १५०९ कोटी १७ लाखांचा होता . परंतु स्थायी समिती मध्ये ह्या अर्थसंकल्पात मोठी वाढ करून अर्थसंकल्प तब्बल २०६२ कोटी ६५ लाखांवर नेऊन ठेवला . मंगळवारी झालेल्या महासभेत त्यामध्ये आणखी वाढ करून अर्थसंकल्प २ हजार ११२ कोटींचा करण्यात आला आहे . सत्ताधारी भाजपाने एकूणच प्रशासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे. 

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत आणि शिवसेनेच्या स्नेहा पांडे यांनी दिलेल्या पत्रात स्थायी समिती मध्ये जी आकडेवारी मंजूर झालेली होती त्यात परस्पर बदल करण्यात आला असून त्याची रेकॉर्डिंग तपासण्यात यावी . हि गंभीर बाब असल्याने कारवाईची मागणी सावंत व पांडे यांनी केली आहे . यामुळे स्थायी समितीने केलेला अर्थसंकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी , परिवहन सेवेत सध्या ५३ बस सुरु असताना परिवहन समिती साठी तब्बल २० कोटी देण्याची मंजुरी म्हणजे ठेकेदाराला पोसण्यासाठी जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपने चालवल्याचा आरोप केला आहे . विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प फुगवून अनावश्यक कामे काढून टेंडर - टक्केवारी साठी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप केला आहे. 

दुसरी कडे सभापती दिनेश जैन म्हणाले कि , आकडेवारी बाबत सावंत यांचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे. सत्ताधारी म्हणून शहराचा विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच अर्थसंकल्प केला आहे . विरोधक नाहक खोटे आरोप करत आहेत. मंगळवारी स्थायी समितीने २०६२ कोटींचा अर्थसंकल्प महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या कडे सादर केला होता . महासभेत २११२ कोटी पर्यंत वाढवून मंजूर करण्यात आला .  प्रशासनाच्या १५०९ कोटींचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपाने २०११ कोटींवर नेऊन ठेवला आहे . गंभीर बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच सन २०२० - २०२१ चा सुधारित अर्थसंकल्प हा केवळ १२६५ कोटी ८६ लाखांचा असल्याचा मंजूर केला आहे . म्हणजेच चालू वर्षाचा अर्थसंकल्प जर १२६५ कोटींचा असताना तो सत्ताधाऱ्यांनी २११२ कोटींवर फुगवण्याचा हेतू काय ? असा प्रश्न केला जात आहे . 

सत्ताधाऱ्यांनी कुठे फुगवले उत्पन्न 

कोरोना संसर्गा मुळे अर्थसंकल्प कोलमडले असताना सत्ताधाऱ्यांनी सूर्य पाणी योजनेसाठी शासना कडून मिळणारे अनुदानाच्या अपेक्षित रकमेत तब्बल २९५ कोटींनी वाढ धरली आहे . या योजनेसाठी कर्ज घेण्याच्या रकमेत सुद्धा ५५ कोटींची वाढ केली आहे . मालमत्ता कराचे उत्पन्न तब्बल ४७ कोटींनी तर मालमत्ता हस्तांतरणचे उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मोकळ्या जागेच्या कराची वसुली होत नसताना त्यात सुद्धा त्याचे उत्पन्न ३० कोटींनी तर इमारत विकास आकार उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मुद्रांक शुल्क अधिभाराच्या उत्पन्नात तब्बल १० कोटींनी तर जाहिरात फलक उत्पन्न ५ कोटींनी वाढवले आहे . मुदत ठेवींवरील व्याज ५ कोटींनी वाढवले आहे . 

कुठे वाढवला  खर्च

सत्ताधाऱ्यांनी नगरसेवक निधी , प्रभाग समिती निधी , स्वेच्छा निधी , आदरातिथ्य भत्ता आदीं खर्च करण्याच्या तरतुदी मध्ये प्रचंड वाढ करून घेतली आहे . बांधकाम विभागाच्या खर्चात १२४ कोटींनी तर  विकास आराखडा अमलबजावणीच्या नावाखाली बांधकाम आदी विभागासाठीच्या खर्चात २१ कोटींनी वाढ केली आहे .  पाणी पुरवठा विभागासाठीच्या खर्चात तर तब्बल ४०८ कोटीं रुपयांची वाढ केली आहे . विशेष म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या खर्चात कपात केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना