शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:11 IST

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा सन २०२० - २१ च्या अर्थसंकल्प १२६५ कोटी ८६ लाखां पर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपाने मात्र सन २०२१ - २०२२ सालचा अर्थसंकल्प मात्र तब्बल २११२ कोटींचा मंजूर केला आहे . प्रशासनाने सादर केलेल्या १५०९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे . सत्ताधाऱ्यांनी महसुली उत्पन्न पेक्षा अर्थसंकल्प अव्वाच्या सव्वा फुगवला असतानाच दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने स्थायी समितीच्या आकडेवारीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेचा २०२१ - २०२२ सालचा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थायी समितीला सादर केला होता . तो अर्थसंकल्प १५०९ कोटी १७ लाखांचा होता . परंतु स्थायी समिती मध्ये ह्या अर्थसंकल्पात मोठी वाढ करून अर्थसंकल्प तब्बल २०६२ कोटी ६५ लाखांवर नेऊन ठेवला . मंगळवारी झालेल्या महासभेत त्यामध्ये आणखी वाढ करून अर्थसंकल्प २ हजार ११२ कोटींचा करण्यात आला आहे . सत्ताधारी भाजपाने एकूणच प्रशासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे. 

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत आणि शिवसेनेच्या स्नेहा पांडे यांनी दिलेल्या पत्रात स्थायी समिती मध्ये जी आकडेवारी मंजूर झालेली होती त्यात परस्पर बदल करण्यात आला असून त्याची रेकॉर्डिंग तपासण्यात यावी . हि गंभीर बाब असल्याने कारवाईची मागणी सावंत व पांडे यांनी केली आहे . यामुळे स्थायी समितीने केलेला अर्थसंकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी , परिवहन सेवेत सध्या ५३ बस सुरु असताना परिवहन समिती साठी तब्बल २० कोटी देण्याची मंजुरी म्हणजे ठेकेदाराला पोसण्यासाठी जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपने चालवल्याचा आरोप केला आहे . विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प फुगवून अनावश्यक कामे काढून टेंडर - टक्केवारी साठी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप केला आहे. 

दुसरी कडे सभापती दिनेश जैन म्हणाले कि , आकडेवारी बाबत सावंत यांचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे. सत्ताधारी म्हणून शहराचा विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच अर्थसंकल्प केला आहे . विरोधक नाहक खोटे आरोप करत आहेत. मंगळवारी स्थायी समितीने २०६२ कोटींचा अर्थसंकल्प महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या कडे सादर केला होता . महासभेत २११२ कोटी पर्यंत वाढवून मंजूर करण्यात आला .  प्रशासनाच्या १५०९ कोटींचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपाने २०११ कोटींवर नेऊन ठेवला आहे . गंभीर बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच सन २०२० - २०२१ चा सुधारित अर्थसंकल्प हा केवळ १२६५ कोटी ८६ लाखांचा असल्याचा मंजूर केला आहे . म्हणजेच चालू वर्षाचा अर्थसंकल्प जर १२६५ कोटींचा असताना तो सत्ताधाऱ्यांनी २११२ कोटींवर फुगवण्याचा हेतू काय ? असा प्रश्न केला जात आहे . 

सत्ताधाऱ्यांनी कुठे फुगवले उत्पन्न 

कोरोना संसर्गा मुळे अर्थसंकल्प कोलमडले असताना सत्ताधाऱ्यांनी सूर्य पाणी योजनेसाठी शासना कडून मिळणारे अनुदानाच्या अपेक्षित रकमेत तब्बल २९५ कोटींनी वाढ धरली आहे . या योजनेसाठी कर्ज घेण्याच्या रकमेत सुद्धा ५५ कोटींची वाढ केली आहे . मालमत्ता कराचे उत्पन्न तब्बल ४७ कोटींनी तर मालमत्ता हस्तांतरणचे उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मोकळ्या जागेच्या कराची वसुली होत नसताना त्यात सुद्धा त्याचे उत्पन्न ३० कोटींनी तर इमारत विकास आकार उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मुद्रांक शुल्क अधिभाराच्या उत्पन्नात तब्बल १० कोटींनी तर जाहिरात फलक उत्पन्न ५ कोटींनी वाढवले आहे . मुदत ठेवींवरील व्याज ५ कोटींनी वाढवले आहे . 

कुठे वाढवला  खर्च

सत्ताधाऱ्यांनी नगरसेवक निधी , प्रभाग समिती निधी , स्वेच्छा निधी , आदरातिथ्य भत्ता आदीं खर्च करण्याच्या तरतुदी मध्ये प्रचंड वाढ करून घेतली आहे . बांधकाम विभागाच्या खर्चात १२४ कोटींनी तर  विकास आराखडा अमलबजावणीच्या नावाखाली बांधकाम आदी विभागासाठीच्या खर्चात २१ कोटींनी वाढ केली आहे .  पाणी पुरवठा विभागासाठीच्या खर्चात तर तब्बल ४०८ कोटीं रुपयांची वाढ केली आहे . विशेष म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या खर्चात कपात केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना