शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

वृक्षलागवडीचे आॅडिट करा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 5:34 AM

श्रीकांत शिंदे यांची मागणी : मांगरूळ डोंगरावरील झाडे खाक, अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

अंबरनाथ : राज्यात सरकारकडून वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, वृक्षलागवड केल्यावर त्याचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग कमी पडत आहे. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मांगरूळ येथे लावलेल्या एक लाख वृक्षांच्या डोंगरावरच वणवा लागून वृक्ष पेटवण्यात आले. सलग दोन वर्षे हा प्रकार घडल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वनविभागाच्या कारभारावर शंका व्यक्त केली आहे. अंबरनाथ तालुक्यात ज्याप्रकारे घटना घडली आहे, तशाच घटना राज्यात इतरत्रही घडल्या असतील. त्यामुळे राज्यातील १३ कोटी वृक्षलागवडीचे आॅडिट करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. १५ हजार नागरिकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी वृक्षलागवड केली होती. मात्र, सलग दोन वर्षे ज्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले, त्याचठिकाणी वणवा लागून झाडे पेटवण्यात आली. बुधवारी रात्री हा प्रकार घडल्यावर गुरुवारी दुपारीदेखील त्या घटनेची पुनरावृत्ती घडली. या वणव्यात आठ हजारांहून अधिक वृक्षांना झळ बसली आहे. या वृक्षांची पाहणी करण्यासाठी खासदार शिंदे हे शुक्रवारी मांगरूळला आले होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी केल्यावर आपला संताप वनविभागाच्या अधिकाºयांवर व्यक्त केला. वनविभागाने योग्य नियोजन न केल्याने आणि सुकलेले गवत न कापल्याने हा वणवा लावण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी राज्यातील वनविभागाच्या धोरणावरच शंका व्यक्त केली आहे. राज्यात १३ कोटी वृक्षलागवड केल्याचे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात त्यातील किती वृक्ष जिवंत आहेत, याची पाहणी करणे गरजेचे आहे. वृक्षलागवड करून ध्येयपूर्ती होत नाही, तर त्यासाठी त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे.नव्याने वृक्षलागवडच्दुसरीकडे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी या वृक्षांची पाहणी केल्यावर जे वृक्ष पूर्ण जळाले आहे, त्याठिकाणी नवीन वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तर, जे जिवंत आहेत, त्यांना पाणी देऊन पुन्हा संजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.च्अंबरनाथमध्ये वनविभागाने या ध्येयालाच बगल दिल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात जी वृक्षलागवड करण्यात आली आहे, त्या वृक्षांचे आॅडिट करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे