शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आश्रमशाळाही आता कात टाकू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 23:28 IST

आधुनिकतेची कास धरत आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील दोन आश्रमशाळांनी मानांकन पटकावले.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीआधुनिकतेची कास धरत आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील दोन आश्रमशाळांनी मानांकन पटकावले. काही वर्षापासून सतत बातमीत असलेल्या राज्यातील काही आदिवासी शाळांनीही आपले रूपडे बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आदिवासी मंत्रालयातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्याचबरोबर आश्रमशाळेचा कायापालट करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाने प्रयत्न सुरू केले आहेत. आश्रमशाळेविषयी अभिमान वाटावा अशी कामे होऊ लागली आहेत.आदिवासी विकास विभागात कायापालट मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार भिनार व चिंबीपाडा सरकारी आश्रमशाळा या आदिवासी मुलांच्या शाळेत कायापालट मोहीम राबवण्यात आली. दोन्ही शाळा तालुक्यातील दुर्गम भागात असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत शालेय परिसर स्वच्छता, शालेय सजावट, शाळा रंगरंगोटी, हॅन्डवॉश, वर्ग सजावट, क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. भिनार शाळेत परसबाग तयार केली असून त्यामध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, मेथी, पालक, शापू आदी भाजीपाला पिकविला जातो. या आश्रमशाळेतील दोन कूपनलिकांना बाराही महिने धोधो पाणी असते,अशी माहिती मुख्याध्यापक जयंत विशे यांनी दिली. तेच पाणी भाजीपाला पिकविण्यासाठी व आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलांना पिण्यासाठी वापरले जातो. तर आश्रमशाळेतील परसबागेत पिकविलेला भाजीपाला मुलांच्या जेवणासाठी वापरला जातो. त्यामुळे स्वावलंबनाची जाणीव मुलांमध्ये करून देण्यात येते. तसेच शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत वारली, मल्हारकोळी, कातकरी, म. ठाकूर यांच्यासह इतर जातीजमातीची मुले-मुली शिक्षण घेत आहेत. पाच एकरमध्ये सुरू असलेली भिनारच्या आश्रमशाळेतील वसतिगृहात १४८ मुले व १६२ मुली शिक्षण घेत आहेत. तर परिसरातील २०० विद्यार्थी याच मुलांबरोबर शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपासून दहावीच्या परीक्षेत ९० ते १०० टक्के निकाल लागत असल्याची दखल यानिमीत्ताने घेण्यात आला.चिंबीपाडा आश्रमशाळेत शालेय परिसर स्वच्छ करून सजावट करण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा चार वर्षे १०० टक्के निकाल असे विविध नाविन्यपूर्ण उपक्र म राबवण्यात आले. त्याची दखल घेत आयएसओ मानांकन प्राप्त झाले.चांगला विद्यार्थी घडविला जात आहेकधी अनुदानामुळे अथवा इतर गैरसोयींच्या कारणाने आदिवासी आश्रमशाळा दुर्लक्षित होत होत्या. दुर्गम भागातील आश्रमशाळांचे या निमित्ताने बदलेले रूप पाहता परिसरातील गोरगरीब व आदिवासींना आश्रमशाळेचे आकर्षण निर्माण झाले आहे. अशा मानांकन मिळालेल्या आश्रमशांळातून मिळालेल्या संस्कारातून शिक्षण घेऊन निघालेला आदिवासी विद्यार्थी पुढे पदवी शिक्षण घेत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण