शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळाही आता कात टाकू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 23:28 IST

आधुनिकतेची कास धरत आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील दोन आश्रमशाळांनी मानांकन पटकावले.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीआधुनिकतेची कास धरत आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील दोन आश्रमशाळांनी मानांकन पटकावले. काही वर्षापासून सतत बातमीत असलेल्या राज्यातील काही आदिवासी शाळांनीही आपले रूपडे बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आदिवासी मंत्रालयातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्याचबरोबर आश्रमशाळेचा कायापालट करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाने प्रयत्न सुरू केले आहेत. आश्रमशाळेविषयी अभिमान वाटावा अशी कामे होऊ लागली आहेत.आदिवासी विकास विभागात कायापालट मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार भिनार व चिंबीपाडा सरकारी आश्रमशाळा या आदिवासी मुलांच्या शाळेत कायापालट मोहीम राबवण्यात आली. दोन्ही शाळा तालुक्यातील दुर्गम भागात असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत शालेय परिसर स्वच्छता, शालेय सजावट, शाळा रंगरंगोटी, हॅन्डवॉश, वर्ग सजावट, क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. भिनार शाळेत परसबाग तयार केली असून त्यामध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, मेथी, पालक, शापू आदी भाजीपाला पिकविला जातो. या आश्रमशाळेतील दोन कूपनलिकांना बाराही महिने धोधो पाणी असते,अशी माहिती मुख्याध्यापक जयंत विशे यांनी दिली. तेच पाणी भाजीपाला पिकविण्यासाठी व आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलांना पिण्यासाठी वापरले जातो. तर आश्रमशाळेतील परसबागेत पिकविलेला भाजीपाला मुलांच्या जेवणासाठी वापरला जातो. त्यामुळे स्वावलंबनाची जाणीव मुलांमध्ये करून देण्यात येते. तसेच शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत वारली, मल्हारकोळी, कातकरी, म. ठाकूर यांच्यासह इतर जातीजमातीची मुले-मुली शिक्षण घेत आहेत. पाच एकरमध्ये सुरू असलेली भिनारच्या आश्रमशाळेतील वसतिगृहात १४८ मुले व १६२ मुली शिक्षण घेत आहेत. तर परिसरातील २०० विद्यार्थी याच मुलांबरोबर शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपासून दहावीच्या परीक्षेत ९० ते १०० टक्के निकाल लागत असल्याची दखल यानिमीत्ताने घेण्यात आला.चिंबीपाडा आश्रमशाळेत शालेय परिसर स्वच्छ करून सजावट करण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा चार वर्षे १०० टक्के निकाल असे विविध नाविन्यपूर्ण उपक्र म राबवण्यात आले. त्याची दखल घेत आयएसओ मानांकन प्राप्त झाले.चांगला विद्यार्थी घडविला जात आहेकधी अनुदानामुळे अथवा इतर गैरसोयींच्या कारणाने आदिवासी आश्रमशाळा दुर्लक्षित होत होत्या. दुर्गम भागातील आश्रमशाळांचे या निमित्ताने बदलेले रूप पाहता परिसरातील गोरगरीब व आदिवासींना आश्रमशाळेचे आकर्षण निर्माण झाले आहे. अशा मानांकन मिळालेल्या आश्रमशांळातून मिळालेल्या संस्कारातून शिक्षण घेऊन निघालेला आदिवासी विद्यार्थी पुढे पदवी शिक्षण घेत आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण