एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

By Admin | Updated: June 21, 2016 01:10 IST2016-06-21T01:10:34+5:302016-06-21T01:10:34+5:30

जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे.

In April 2017, the Thane was distributed free of cost | एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

एप्रिल २०१७ मध्ये ठाणे हागणदरीमुक्त

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांना विळखा खातलेल्या हागणदरीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सुटका होण्यासाठी हागणदरीचे वाढते प्रदूषण कायमचे रोखणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने वर्षभरात ३४ हजार शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गावे हागणदीमुक्त होणार असल्याचा विश्वास पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘ पर्यावरण संतुलीत गाव, इको व्हीलेज, या उपक्रमास अनुसरून बोरकर यांना बोलते केले असता त्या बोलत होत्या. आता प्रत्येक गावे हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनव्दारे प्रत्येक कुटुंबास वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. याशिवाय सार्वजनीक शौचालये बांधण्यासाठी देखील ग्राम पंचायतींना मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. यासाठी ‘आमचा गाव- आमचा विकास’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १८७ ग्राम पंचायतींचे सर्वेक्षण विकास आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये हागणदरी निर्मुलन विकास आराखडा (ओडीईपी) तयार करून ३४ हजार ९८६ शौलयालये वर्षभरात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक कुटुंबियास सुमारे १२ हजार रूपये प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील गावांचा २०१२ मध्ये पायभूत सर्वेक्षण (बीएलएस) करण्यात आले असता सुमारे दोन लाख पाच हजार ४८५ कुटुंबियांकडे शौचालय नव्हते. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७० हजार ९२८ कुटुबियांना मागील तीन वर्षांत शौचालय बांधून देण्यात आले. यापैकी मागील वर्षभरात २७ हजार ३३४ शौचालये बांधण्यात आली आहेत. याशिवाय आतापर्यंत कल्याण व आंबरनाथ हे दोन तालुके शंभर टक्के हागणदरी मुक्तही झाले आहेत. उर्वरित शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शौचालये बांधण्यात येणार आहे. वर्षभरात बांधण्यात येणाऱ्या ३४ हजार ९८६ शौचालयांपैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यात २१ हजार ६०० शौचालये बांधली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तीक शौचालये, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आदीव्दारे ती बांधली जाणार आहेत. त्यांसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन बांधून घेतले जाणार आहे. यामुळे एप्रिल २०१७ ला ठाणे जिल्हा हागणदरी मुक्त होणार असल्याचा दावा बोरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In April 2017, the Thane was distributed free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.