शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:20 IST

Ulhasnagar News: जागतिक जल दिनाचे औचित्य साधून प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी मुंडन केले. 

-मुरलीधर भवार, कल्याणउल्हास नदी ही बारमाही पाण्याचा मोठा जलस्त्रोत आहे. या नदीला येऊन मिळणारे सांडपाणी आणि रासायनिक पाण्याचे नाले बंद केले जात नाही. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना केली जात नाही. आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधत मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. प्रशासनाच्या नाककर्तेपणाच्या विरोधात निकम यांच्यासह उमेश बोरगांवकर यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निकम यांच्यासह बोरगांवकर, माजी नगरसेवक कैलास शिंदे याच्या आंदोलनाला श्रीनिवास घाणेकर, शशिकांत दायमा आणि रविंद्र लिंगायत यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ते २०१४ सालापासून विविध सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यांना केवळ आश्वासने दिली जातात. त्याची पूर्तता केली जात नाही. 

नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. उल्हास नदीला सांडपाण्याचे आणि रासायनिक पाण्याचे नाले येऊन मिळतात. उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण या सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी तसे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी. त्यासाठी तिचे प्रदूषण रोखले जावे अशी सरकारी यंत्रमांची इच्छाशक्ती नाही. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्याकडून नदी प्रदूषण दूर करण्याची केवळ आश्वासने दिली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या विरोधात निकम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी पात्रात आंदोलन सुरु केले आहे. 

२२ मार्चपासून दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत आंदोलकर्ते नदी पात्रात उभे राहणार आहेत. सायंकाळी पाच ते सकाळी ११ या वेळेत ते नदी किनारी टाकलेल्या मंडपात बसून ढिम्म प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार आहेत. 

यापूर्वी निकम यांनी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी नदीपात्रात रात्रंदिवस उभे राहून जवळपास ३६ दिवस आंदोलन केले आहे. आत्ता तरी प्रशासनाने त्याची दखल घेऊन योग्य तरी कार्यवाही करावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन