शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:20 IST

Ulhasnagar News: जागतिक जल दिनाचे औचित्य साधून प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी मुंडन केले. 

-मुरलीधर भवार, कल्याणउल्हास नदी ही बारमाही पाण्याचा मोठा जलस्त्रोत आहे. या नदीला येऊन मिळणारे सांडपाणी आणि रासायनिक पाण्याचे नाले बंद केले जात नाही. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना केली जात नाही. आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधत मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. प्रशासनाच्या नाककर्तेपणाच्या विरोधात निकम यांच्यासह उमेश बोरगांवकर यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

निकम यांच्यासह बोरगांवकर, माजी नगरसेवक कैलास शिंदे याच्या आंदोलनाला श्रीनिवास घाणेकर, शशिकांत दायमा आणि रविंद्र लिंगायत यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ते २०१४ सालापासून विविध सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यांना केवळ आश्वासने दिली जातात. त्याची पूर्तता केली जात नाही. 

नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. उल्हास नदीला सांडपाण्याचे आणि रासायनिक पाण्याचे नाले येऊन मिळतात. उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण या सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी तसे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी. त्यासाठी तिचे प्रदूषण रोखले जावे अशी सरकारी यंत्रमांची इच्छाशक्ती नाही. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्याकडून नदी प्रदूषण दूर करण्याची केवळ आश्वासने दिली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या विरोधात निकम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी पात्रात आंदोलन सुरु केले आहे. 

२२ मार्चपासून दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत आंदोलकर्ते नदी पात्रात उभे राहणार आहेत. सायंकाळी पाच ते सकाळी ११ या वेळेत ते नदी किनारी टाकलेल्या मंडपात बसून ढिम्म प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार आहेत. 

यापूर्वी निकम यांनी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी नदीपात्रात रात्रंदिवस उभे राहून जवळपास ३६ दिवस आंदोलन केले आहे. आत्ता तरी प्रशासनाने त्याची दखल घेऊन योग्य तरी कार्यवाही करावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदीwater pollutionजल प्रदूषणwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन