शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

अंबरनाथमध्ये उदंड जाहली अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:58 IST

कुठल्याही शहरात अतिक्रमणे उभी राहतात, ती आर्थिक संबंधातूनच. त्यामुळे तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जाईल, याची शाश्वती नसते. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी भ्रष्टाचार थांबणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंकज पाटील

स्वच्छ भारत अभियानात चमकदार कामगिरी बजावणाऱ्या अंबरनाथ पालिकेसमोरील मोठे आव्हान म्हणजे वाढते अतिक्रमण. या अतिक्रमणांविरोधात पालिकेला स्वच्छता अभियानासारखी चमकदार कामगिरी अजूनही बजावता आलेली नाही. मुळात अतिक्रमण रोखण्यात आणि झालेले अतिक्रमण तोडण्यात पालिकेला अपयश आले आहे. ही वास्तवता बदलण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच हालचाल केली जात नाही. अतिक्रमणांवरील कारवाईअभावी शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरणही रखडलेले आहे. शहराच्या वाढत्या अतिक्रमणांना पालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याने आता अतिक्रमणांवर नव्हे तर अधिकाऱ्यांवरच कारवाईची गरज व्यक्त होत आहे.अंबरनाथमधील ३० टक्के वस्ती ही आजही झोपडपट्टीत राहत आहे. शहरात वनविभागाची जागा असो वा राज्य सरकारची, कोणत्याही जागेवर अतिक्रमण उभारताना पालिकेच्या अधिकाºयांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. पालिका क्षेत्रातील कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या जागेवर अतिक्रमण होत असले, तरी त्यांना सुविधा देण्याची जबाबदारी ही पालिकेवर येते. इतर सरकारी जागांवर अतिक्रमण होत असताना पालिका प्रशासनही जागा पालिकेची नाही, असे कारण पुढे करून या अतिक्रमणांना अप्रत्यक्ष संरक्षण देते.

मुळात अतिक्रमणांवर कारवाई न करण्यासाठी आर्थिक सौदेबाजी ही पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आधीच केलेली असते. तक्रार आली तर कारण पुढे काय करायचे, हेही ठरलेले असते. कोणी अतिक्रमणांची तक्रार केली, तर ते अतिक्रमण पालिकेच्या जागेत नाही, त्यामुळे आम्ही कारवाई करणार नाही, ही भूमिका घेतली जाते. दुसरे म्हणजे जे अतिक्रमण पालिकेच्या जागांवर आहे, त्यावर कारवाईची मागणी केली, तर त्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही, हे कारण पुढे केले जाते. या दोन ठरलेल्या कारणांमुळेच शहरात अतिक्रमणांची संख्या वाढलेली आहे. अंबरनाथ पालिका क्षेत्रात गेल्या तीन ते चार वर्षांत शेकडोच्या संख्येने अतिक्रमणे झाली आहे. त्यांच्यावर कारवाई मात्र हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच झाली आहे.

अतिक्रमण विभागाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्याच व्यक्तीला अतिक्रमण करण्याचे कंत्राट देण्याची पद्धतही शहरात प्रचलित झाली आहे. अतिक्रमणाचे कंत्राट घेणाराच पालिकेची आर्थिक यंत्रणा सांभाळत अतिक्रमणांवर कारवाई होणार नाही, याची शाश्वतीही देतो. शहरातील जावसई, फुलेनगर, महेंद्रनगर, मोरिवलीगाव, मोरिवलीपाडा, चिखलोली, फॉरेस्टनाका, शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, बारकूपाडा, लोकनगरी परिसर आणि सर्वाधिक अतिक्रमणे ही ज्या परिसरात होतात, तो परिसर म्हणजे बुवापाडा. या भागात सातत्याने अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. चाळींचे बांधकाम करताना त्या चाळीतले घर विकण्याआधीच त्यावर कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र, गरीब लोकांनी घरे खरेदी केल्यावर त्यावर कारवाई होत असल्याने बांधकाम करणाºया भूमाफियांचे कोणतेच नुकसान होत नाही. जे काही नुकसान होते, ते घर खरेदी करणाºयांचे होते. अनेकांनी आपल्या मेहनतीचे पैसे या घरांसाठी खर्च केले. मात्र, पालिकेच्या लाचार अधिकाºयांनी गरिबांच्या घरांवर जेसीबी फिरवले.

अतिक्रमणांचा मुद्दा हा स्पष्ट असून नव्या अतिक्रमण होणाºया भागात त्यात्या अधिकाºयाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. ज्या अधिकाºयावर त्याच्या परिसराची जबाबदारी दिली आहे, त्या भागात अतिक्रमण झाल्यास संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबली गेली, तरच शहरातील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. शहरात ज्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे, त्याचप्रमाणात रस्त्याच्या कडेला टपºयांची संख्याही वाढत आहे. शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर कायमस्वरूपी टपºया उभारल्या आहेत. काही ठिकाणी टपरी ही भाड्याने दिली आहे. टपरीसोबत रस्त्यांवरील हातगाड्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्टेशन परिसर हा रात्रीच्यावेळी हातगाड्यांनी गजबजून गेलेला असतो. त्या ठिकाणी चालणेही अवघड जाते. या सर्व त्रासाला सामोरे जाण्याची वेळ ही नागरिकांवर आलेली असतानाही त्यासंदर्भात प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

नगराध्यक्षही फेरीवाल्यांमुळे त्रस्तअंबरनाथ पश्चिम भागातील भाजी मार्केटमध्ये भाजीखरेदीसाठी जाणाºया नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनाही फेरीवाले आणि हातगाड्यांचा त्रास सहन करावा लागतो. भाजी मंडईचा मार्गच फेरीवाल्यांनी व्यापल्याची तक्रार त्यांनी स्वत: अधिकाºयांकडे केली. तरीही, निगरगट्ट अधिकारी या फेरीवाल्यांवर कोणतीच कारवाई करत नाही. भाजी मंडईचा मुख्य रस्ता हा फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे, तो मोकळा करा, अशा सूचना देऊनही त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचे काम अधिकारी करतात. शहराच्या प्रथम नागरिकालाच अधिकारी जुमानत नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागावी तरी कुणाकडे, हा प्रश्न पडला आहे. अधिकाºयांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठीच आता लोकप्रतिनिधींना संघटित होऊन आवाज उठवण्याची गरज भासणार आहे.