शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीचा पाया रचला अंबरनाथमध्ये, पालिकेत एकत्र येत केली विकासकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 01:34 IST

राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अंबरनाथ : राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शहर विकासाची काम करीत असल्याचे पाहावयास मिळते.२०१५ मध्ये अंबरनाथ पालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी आणि त्यानंतर २०१७ मध्ये अशा दोन वेळा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही वेळेस ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलाहोता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली नगरसेवकांची पळवापळवी थोडक्यात म्हणायचे तर झालेला घोडेबाजार लक्षात घेऊन त्यानंतरच्या निवडणुकीत शहर विकासासाठी आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.जानेवारी २०१७ मध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रभागात काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाचा तसेच विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा झाला होता. या कार्यक्र माला पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व शहर अध्यक्ष सदाशिव पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्र मात भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. कार्यक्र माच्या बॅनरवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे झळकली होती.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात लावलेल्या बॅनरचा आवर्जून उल्लेख केला होता. शहर विकासासाठी पक्षभेद विसरून काँग्रेसने लोकप्रतिनिधींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. याचा राज्याने आदर्श घ्यावा असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यांचे हे वाक्य आजखरे ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेत मध्येच गटबाजी निर्माण झाल्याने त्याठिकाणी सत्तेचे समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सत्तेत भाजपनेही पुढाकार घेऊन शिवसेनेच्या एका गटाच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपची ही खेळीहाणून पाडण्यात पुन्हा एकदा काँग्रेसने पुढाकार घेतला होता. नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे पाठिंबा देत असताना कोणतेहीपद काँग्रेसने स्वीकारले नव्हते.पाच वर्षे एकत्रगेल्या पाच वर्षात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्रित निवडणूक लढवत आली आहे. अशा परिस्थितीत राज्यात निर्माण झालेली महाविकास आघाडी त्याचा पाया हा अंबरनाथमधील रचला गेला असेम्हटले तर वावगे ठरणार नाही 

टॅग्स :ambernathअंबरनाथShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस