शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शासनजमा झालेल्या हॉस्पिटलच्या भूखंडावरुन झाला गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 00:41 IST

अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदला हॉस्पिटल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५२ वर्षांपूर्वी दिलेला भूखंड पुन्हा ताब्यात घेतला आहे. यासंदर्भातील आदेशाची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाला नव्हती. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त येताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दुसरीकडे पालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करताना काँग्रेसने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. अधिकारी बेजबाबदारपणा दाखवत असल्याने पालिकेच्या ताब्यातील भूखंड शासनजमा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी या वेळी केला. पाटील यांच्या आरोपानंतर प्रशासनाने आपली चूक कबुल केली असून हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पालिका सभागृहात पार पडली. सभा सुरु झाल्यावर लागलीच काँग्रेसच्या गटनेत्यांनी लोकमतमधील वृत्ताबाबत सभागृहात चर्चा सुरु केली. अंबरनाथ पालिकेचा ३ एकरचा हॉस्पीटलसाठी राखवी असलेला भूखंड हा पुन्हा शासन जमा केल्याचे सदस्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. पालिकेच्या विरोधात एवढा मोठा निर्णय झालेला असतानाही पालिकेला त्याची किंचितही कल्पना नव्हती. यासंदर्भात पालिका प्रशासनाने आपली तत्परता दाखवली नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

गेली ५२ वर्षे हा भूखंड संरक्षित ठेवण्याचे काम कोहोजगाव ग्रामस्थांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, या भूखंडाच्या संरक्षणासाठी भिंतदेखील उभारली होती. मात्र २०१४ ते २०१६ या कार्यकाळात सहावेळा सुनावणी झाली असताना पालिकेच्या वतीने एकही अधिकारी या सुनावणीला हजर राहिलेला नाही. ही गंभिर चूक असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी प्रदिप पाटील यांनी केली. या भूखंडाच्या संरक्षणाबाबत नगरसेवक वारंवार पाठपुरावा करत असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला.

पालिकेचा भूखंड शासनजमा होण्यास पालिकेचे सर्व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका वृशाली पाटील यांनी केले. या आधीदेखील असे प्रकार पालिकेसोबत घडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी सभागृहात मान्य करण्यात आली. या चर्चेनंतर प्रदिप पाटील यांनी सभागृहात हा भूखंड शासनाकडून पुन्हा मिळविण्यासाठी अपील करावे अशी मागणी केली. त्यालादेखील सभागृहाने सहमती दर्शवली.

बेथल चर्च रस्त्याची मार्किंग करण्याचे आदेश

अंबरनाथमधील बेथल चर्च ते फुलेनगरकडे जाणाºया एमएमआरडीएच्या रस्त्याचे काम रखडले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने रुंदीकरणाची मार्किंग न केल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ करण्यासाठी मार्किंग करण्याचे आदेश नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी दिले.

भाजपचा सभात्याग

शहरातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना भाजपच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेला विरोध दर्शविला. भाजप नगरसेवकांचे विषय घेतले जात नसल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. यावर संतापलेल्या सत्ताधाºयांनीदेखील भाजप नगरसेवकांचे जे विषय पटलावर आहेत ते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत यानिमित्ताने चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.

मा. गांधी विद्यालयाच्या जागेवर फेरीवाले

अंबरनाथ पालिकेने स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी या फेरीवाल्यांना स्टेशनच्या बाहेर, म्हणजे २०० मिटर अंतरावर हलविण्याची तयारी केली आहे. मात्र पश्चिम भागातील फेरीवाल्यांना ज्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे, ती जागा महात्मा गांधी विद्यालयाची आहे. शासनाने ही जागा महात्मा गांधी विद्यालयाला दिलेली आहे. त्यामुळे पालिकेने हा कसा निर्णय घेतला याबाबत सभागृहात संभ्रम निर्माण झाला होता.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाambernathअंबरनाथMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारroad transportरस्ते वाहतूक