शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शासनजमा झालेल्या हॉस्पिटलच्या भूखंडावरुन झाला गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 00:41 IST

अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदला हॉस्पिटल उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५२ वर्षांपूर्वी दिलेला भूखंड पुन्हा ताब्यात घेतला आहे. यासंदर्भातील आदेशाची कोणतीही माहिती पालिका प्रशासनाला नव्हती. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त येताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दुसरीकडे पालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करताना काँग्रेसने पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले. अधिकारी बेजबाबदारपणा दाखवत असल्याने पालिकेच्या ताब्यातील भूखंड शासनजमा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी या वेळी केला. पाटील यांच्या आरोपानंतर प्रशासनाने आपली चूक कबुल केली असून हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पालिका सभागृहात पार पडली. सभा सुरु झाल्यावर लागलीच काँग्रेसच्या गटनेत्यांनी लोकमतमधील वृत्ताबाबत सभागृहात चर्चा सुरु केली. अंबरनाथ पालिकेचा ३ एकरचा हॉस्पीटलसाठी राखवी असलेला भूखंड हा पुन्हा शासन जमा केल्याचे सदस्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. पालिकेच्या विरोधात एवढा मोठा निर्णय झालेला असतानाही पालिकेला त्याची किंचितही कल्पना नव्हती. यासंदर्भात पालिका प्रशासनाने आपली तत्परता दाखवली नाही, असा आरोप पाटील यांनी केला.

गेली ५२ वर्षे हा भूखंड संरक्षित ठेवण्याचे काम कोहोजगाव ग्रामस्थांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, या भूखंडाच्या संरक्षणासाठी भिंतदेखील उभारली होती. मात्र २०१४ ते २०१६ या कार्यकाळात सहावेळा सुनावणी झाली असताना पालिकेच्या वतीने एकही अधिकारी या सुनावणीला हजर राहिलेला नाही. ही गंभिर चूक असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी प्रदिप पाटील यांनी केली. या भूखंडाच्या संरक्षणाबाबत नगरसेवक वारंवार पाठपुरावा करत असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला.

पालिकेचा भूखंड शासनजमा होण्यास पालिकेचे सर्व अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका वृशाली पाटील यांनी केले. या आधीदेखील असे प्रकार पालिकेसोबत घडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी सभागृहात मान्य करण्यात आली. या चर्चेनंतर प्रदिप पाटील यांनी सभागृहात हा भूखंड शासनाकडून पुन्हा मिळविण्यासाठी अपील करावे अशी मागणी केली. त्यालादेखील सभागृहाने सहमती दर्शवली.

बेथल चर्च रस्त्याची मार्किंग करण्याचे आदेश

अंबरनाथमधील बेथल चर्च ते फुलेनगरकडे जाणाºया एमएमआरडीएच्या रस्त्याचे काम रखडले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने रुंदीकरणाची मार्किंग न केल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ करण्यासाठी मार्किंग करण्याचे आदेश नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी दिले.

भाजपचा सभात्याग

शहरातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा सुरु असताना भाजपच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेला विरोध दर्शविला. भाजप नगरसेवकांचे विषय घेतले जात नसल्याचा आरोप करत भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला. यावर संतापलेल्या सत्ताधाºयांनीदेखील भाजप नगरसेवकांचे जे विषय पटलावर आहेत ते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत यानिमित्ताने चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.

मा. गांधी विद्यालयाच्या जागेवर फेरीवाले

अंबरनाथ पालिकेने स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी या फेरीवाल्यांना स्टेशनच्या बाहेर, म्हणजे २०० मिटर अंतरावर हलविण्याची तयारी केली आहे. मात्र पश्चिम भागातील फेरीवाल्यांना ज्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे, ती जागा महात्मा गांधी विद्यालयाची आहे. शासनाने ही जागा महात्मा गांधी विद्यालयाला दिलेली आहे. त्यामुळे पालिकेने हा कसा निर्णय घेतला याबाबत सभागृहात संभ्रम निर्माण झाला होता.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाambernathअंबरनाथMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारroad transportरस्ते वाहतूक