शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 01:37 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे.

- अजित मांडकेठाणे : २००९ पासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अधिकची मते मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात बोलणारे आव्हाड हे एकमेव शत्रू असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न युतीकडून सुरूझाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळीसुद्धा या मतदारसंघात चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु, या मतदारसंघातून कोण लढणार शिवसेना की भाजप, याबाबतची उत्सुकता शिगेला आहे. शिवाय, वंचित आघाडी आणि एमआयएम हासुद्धा या मतदारसंघात निर्णायक घटक मानला जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देऊन कळवा, विटावा पट्ट्यातील मतेसुद्धा आपल्या पारड्यात खेचण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांत या मतदारसंघाचा अभ्यास सुरू आहे.कळवा-मुंब्रा यासह राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसला. कळव्यात शिवसेनेकडे केवळ सात नगरसेवक असून, तर मुंब्य्रात भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली, तरी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार निर्णायक भूमिकेत असणार आहे. एकूणच आता युतीकडून आव्हाड गड सर करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार की भाजप, यावर सध्या या दोन्ही पक्षांचा अभ्यास सुरू आहे. शिवाय, एमआयएमलासुद्धा हाताशी घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे.मात्र, असे जरी असले तरी २००९ मध्ये कळवा-मुंब्य्राची असलेली परिस्थिती आणि आता २०१९ मध्ये बदललेली परिस्थिती ही आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला आमदार म्हणूनही त्यांची या पट्ट्यात ओळख आहे. मागील १० वर्षांत दिलेली आश्वासने आणि त्या दृष्टीने केलेली वचनपूर्ती ही आव्हाडांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, भाजप सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच देशातील भाजपविरोधी असणाऱ्या मंडळींना जसे शांत केले, तसाच काहीसा प्रयत्न आता होताना दिसू लागला आहे.

टॅग्स :thaneठाणे