शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 01:37 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे.

- अजित मांडकेठाणे : २००९ पासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अधिकची मते मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात बोलणारे आव्हाड हे एकमेव शत्रू असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न युतीकडून सुरूझाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळीसुद्धा या मतदारसंघात चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु, या मतदारसंघातून कोण लढणार शिवसेना की भाजप, याबाबतची उत्सुकता शिगेला आहे. शिवाय, वंचित आघाडी आणि एमआयएम हासुद्धा या मतदारसंघात निर्णायक घटक मानला जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देऊन कळवा, विटावा पट्ट्यातील मतेसुद्धा आपल्या पारड्यात खेचण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांत या मतदारसंघाचा अभ्यास सुरू आहे.कळवा-मुंब्रा यासह राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसला. कळव्यात शिवसेनेकडे केवळ सात नगरसेवक असून, तर मुंब्य्रात भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली, तरी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार निर्णायक भूमिकेत असणार आहे. एकूणच आता युतीकडून आव्हाड गड सर करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार की भाजप, यावर सध्या या दोन्ही पक्षांचा अभ्यास सुरू आहे. शिवाय, एमआयएमलासुद्धा हाताशी घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे.मात्र, असे जरी असले तरी २००९ मध्ये कळवा-मुंब्य्राची असलेली परिस्थिती आणि आता २०१९ मध्ये बदललेली परिस्थिती ही आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला आमदार म्हणूनही त्यांची या पट्ट्यात ओळख आहे. मागील १० वर्षांत दिलेली आश्वासने आणि त्या दृष्टीने केलेली वचनपूर्ती ही आव्हाडांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, भाजप सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच देशातील भाजपविरोधी असणाऱ्या मंडळींना जसे शांत केले, तसाच काहीसा प्रयत्न आता होताना दिसू लागला आहे.

टॅग्स :thaneठाणे