शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांना घेरण्याचा युतीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 01:37 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे.

- अजित मांडकेठाणे : २००९ पासून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा दबदबा आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट असतानाही राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अधिकची मते मिळाली होती. भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात बोलणारे आव्हाड हे एकमेव शत्रू असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न युतीकडून सुरूझाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळीसुद्धा या मतदारसंघात चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु, या मतदारसंघातून कोण लढणार शिवसेना की भाजप, याबाबतची उत्सुकता शिगेला आहे. शिवाय, वंचित आघाडी आणि एमआयएम हासुद्धा या मतदारसंघात निर्णायक घटक मानला जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली. सोबतच राष्ट्रवादीच्याही मतांची वाढ झाली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देऊन कळवा, विटावा पट्ट्यातील मतेसुद्धा आपल्या पारड्यात खेचण्याचा युतीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मागील काही महिन्यांत या मतदारसंघाचा अभ्यास सुरू आहे.कळवा-मुंब्रा यासह राष्टÑवादीकडे ३१ नगरसेवकांचे पाठबळ येथे आहे. शिवसेनेला मात्र कळवा आणि मुंब्य्रात फटका बसला. कळव्यात शिवसेनेकडे केवळ सात नगरसेवक असून, तर मुंब्य्रात भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी तीन हजार ८४७ मते मिळाली होती. तर, शिवसेनेला ३८ हजार ८५०, एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत या पट्ट्यात वंचित आघाडी चालली नसली, तरी विधानसभा निवडणुकीत तिचा उमेदवार निर्णायक भूमिकेत असणार आहे. एकूणच आता युतीकडून आव्हाड गड सर करण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना लढणार की भाजप, यावर सध्या या दोन्ही पक्षांचा अभ्यास सुरू आहे. शिवाय, एमआयएमलासुद्धा हाताशी घेण्याचा प्रयत्न या दोघांनी सुरू केला आहे.मात्र, असे जरी असले तरी २००९ मध्ये कळवा-मुंब्य्राची असलेली परिस्थिती आणि आता २०१९ मध्ये बदललेली परिस्थिती ही आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेला आमदार म्हणूनही त्यांची या पट्ट्यात ओळख आहे. मागील १० वर्षांत दिलेली आश्वासने आणि त्या दृष्टीने केलेली वचनपूर्ती ही आव्हाडांसाठी जमेची बाजू मानली जात आहे. परंतु, भाजप सरकारच्या विरोधात तेवढ्याच ताकदीने बोलणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच देशातील भाजपविरोधी असणाऱ्या मंडळींना जसे शांत केले, तसाच काहीसा प्रयत्न आता होताना दिसू लागला आहे.

टॅग्स :thaneठाणे