शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 5:42 PM

भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या.

राजू काळेभार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. त्यामुळे तूर्तास त्या सुरक्षित असून किना-यावरील मासळी सुकविण्याच्या जागेतील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान झाल्याचे पाली मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.बोटींना समुद्रात मच्छीमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारीच जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांना सावधनतेचा इशारा दिला होता. त्यानुसार मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी देखील पश्चिम किनारपट्टीवरील शहराच्या हद्दीतील भाटेबंदर ते पाली दरम्यानच्या मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. पालिकेसह जिल्हाप्रशासन व उत्तन-सागरी पोलिसांनी किना-याचा ताबा घेत समुद्रात जाणा-यांना रोखले. दर १५ मिनिटांनी वादळाचा वेध घेत किना-यावरील मच्छीमारांना जागरुक राहण्यासाठी त्याची माहिती दिली जात होती.दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत किना-यावरील सर्व बोटी किना-यावरील जेट्टींलगत सुरक्षितपणे नांगरण्यात आल्या. मंगळवारी मध्यरात्री समुद्रातील मोठ्या भरतीमुळे पाण्याची पातळी वाढली होती. मात्र त्यात किना-यावरील काही साहित्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे डिमेलो यांनी सांगितले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सांगितले कि, गेल्या तीन दिवसांपासुन किना-यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देणे सुरु होते. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी वेळेतच किना-यावर नांगरण्यात आल्या. तरीदेखील पोलिसांची किना-यावर गस्त सुरु असुन वादळाचा आढावा सतत घेतला जात आहे. ओखी वादळामुळे शहरात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली. ती मंगळवारीही कायम होती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरOckhi Cycloneओखी चक्रीवादळ