शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 12:49 AM

अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली.

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी कल्याण न्यायालयात लागला. या सहाही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष सोडण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीचा याआधीच अपघातात मृत्यू झाला आहे.वारिंगे यांचा भाचा समीर गोसावी याची २००९ मध्ये पेट्रोलपंपावर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भालचंद्र भोईर आणि त्यांच्या तीन भावांसह काही कुटुंबीयांना तुरुंगात जावे लागले होते. या हत्येचा पाठपुरावा वारिंगे करत असल्याने त्यांचा काटा काढण्यासाठी भोईर याने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ६ मे २०११ रोजी वारिंगे हे आपल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत असताना दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या हल्ल्यात वारिंगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वारिंगे यांचे कोणासोबत वैर होते, याची चाचपणी करण्यात आली. या तपासात भालचंद्र या तुरुंगात असलेल्या आरोपीवर संशय आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना महेंद्र केवट आणि दत्तात्रेय गायकवाड या दोघांना अटक केली.या दोघांनीच वारिंगे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भालचंद्र याने तुरुंगात असताना त्याच्यासोबत असलेल्या सुमित येरुणकर याच्यासोबत मैत्री वाढवली. वारिंगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर, सुमितवर महेंद्र आणि दत्तात्रेय यांच्या मदतीने हत्येचा आरोप होता. या मारेकऱ्यांना नितीन ठाणगे आणि संतोष यादव या रिक्षाचालकाने मदत केल्याचा आरोप केला होता.>सात वर्षांनंतर निकालया प्रकरणात नितीन हा जामिनावर सुटलेला असताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा निकाल सात वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने दिला आहे. वारिंगे यांच्या हत्या प्रकरणात सबळ पुरावा नसल्याने सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.