शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Ajit Pawar: अजित पवारांची वज्रमुठीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:22 IST

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. वज्रमुठीत त्यांची गळचेपी होत असून, ते लवकरच आपला निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ज्या पक्षाचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरू झाल्यानंतर त्यांची एण्ट्री होते, ज्यांचे ५६ आमदार आहेत त्यांना मात्र मान दिला जात नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली. त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मानाचे पान त्यांना देऊ, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार यावरून म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कशाही पद्धतीने टीका करतात, त्यांचे पाय ‘मातोश्री’ला लागणे हे कदापि न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु राहुल यांनी आपला पीए पाठविला आणि उद्धव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनिया आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील, असे सांगितले. त्यामुळे आता उद्धव व आदित्य दिल्लीला जाऊन मुजरा करणार का, असा सवालही म्हस्के यांनी केला.

ठाकरी बाण्याचे कायकाही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे, असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. ती हिंमत गेली कुठे, असा सवाल म्हस्के यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस