शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Ajit Pawar: अजित पवारांची वज्रमुठीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:22 IST

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. वज्रमुठीत त्यांची गळचेपी होत असून, ते लवकरच आपला निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ज्या पक्षाचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरू झाल्यानंतर त्यांची एण्ट्री होते, ज्यांचे ५६ आमदार आहेत त्यांना मात्र मान दिला जात नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली. त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मानाचे पान त्यांना देऊ, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार यावरून म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कशाही पद्धतीने टीका करतात, त्यांचे पाय ‘मातोश्री’ला लागणे हे कदापि न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु राहुल यांनी आपला पीए पाठविला आणि उद्धव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनिया आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील, असे सांगितले. त्यामुळे आता उद्धव व आदित्य दिल्लीला जाऊन मुजरा करणार का, असा सवालही म्हस्के यांनी केला.

ठाकरी बाण्याचे कायकाही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे, असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. ती हिंमत गेली कुठे, असा सवाल म्हस्के यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस