शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

Ajit Pawar: अजित पवारांची वज्रमुठीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:22 IST

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तूर्तास आपल्या राजकीय निर्णयाला ब्रेक लावला असला तरी ते नाराज असून, त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. वज्रमुठीत त्यांची गळचेपी होत असून, ते लवकरच आपला निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यातील एका पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ज्या पक्षाचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरू झाल्यानंतर त्यांची एण्ट्री होते, ज्यांचे ५६ आमदार आहेत त्यांना मात्र मान दिला जात नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली. त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मानाचे पान त्यांना देऊ, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी ‘मातोश्री’वर येणार यावरून म्हस्के यांनी नाराजी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कशाही पद्धतीने टीका करतात, त्यांचे पाय ‘मातोश्री’ला लागणे हे कदापि न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु राहुल यांनी आपला पीए पाठविला आणि उद्धव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनिया आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील, असे सांगितले. त्यामुळे आता उद्धव व आदित्य दिल्लीला जाऊन मुजरा करणार का, असा सवालही म्हस्के यांनी केला.

ठाकरी बाण्याचे कायकाही दिवसांपूर्वी सिल्व्हर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे, असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. ती हिंमत गेली कुठे, असा सवाल म्हस्के यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस