शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पद निर्मितीत अडकला भाईंदरमधील जोशी रुणालय हस्तांतरणाचा करार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:13 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या.

राजू काळे / भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. परंतु, हे रुग्णालय राज्य सरकारकडून चालविण्यासाठी त्यात पुरेसे डॉक्टर्स व कर्मचा-यांच्या पद निर्मितीला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याची बाब समोर आल्याने रुग्णालय हस्तांतरणाचा करार त्यात अडकल्याचे समोर आले आहे. 

पालिकेने कोट्यवधींचा निधी खर्ची घालून २०१२ मध्ये बांधलेले चार मजली रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालविले जावे, यासाठी आॅगस्ट २०१२ मधील महासभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी २००६ मध्ये माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी पालिकेने शहरात सर्व साधारण रुग्णालय बांधावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावरील अंतिम सुनावणी प्रलंबित असल्याने पालिकेने त्या मंजूर ठरावाच्या अनुषंगाने न्यायालयाकडे हस्तांतरणासाठी परवानगी मागितली. ती न्यायालयाने फेटाळून रुग्णालय पालिकेनेच चालविण्याचे आदेश दिले. त्याला पालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता या न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे सरकारचे दरवाजे बंद झाल्याने पालिकेने राजकीय माध्यमातून रुग्णालय हस्तांतरणाचा मुद्दा सरकारकडे रेटण्यास सुरुवात केली. आ. प्रताप सरनाईक यांच्यासह आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यातच १० जानेवारी २०१६ रोजी रुग्णालयाचे लोकार्पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्र्यांच्याच हस्तेच पार पाडण्यात आले. तद्नंतर ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालय हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली. परंतु, न्यायालयाने रुग्णालय पालिकेनेच चालवावे, असे आदेश दिले असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या हस्तांतरणाच्या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करीत म्हात्रे यांनी १५ फेब्रुवारीला पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

एका बाजूला रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रीया सुरू असताना पालिकेकडुन रुग्णालयात देण्यात येणारी रुग्णसेवा असमाधानकारक असल्याचा दावा करणारी दुसरी याचिका महेंद्र लोरीक यादव यांनी ६ जानेवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान ९ आॅगस्ट रोजी पालिकेने रुग्णालय हस्तांतरणाचा प्रारुप सामंजस्य करार राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला. त्याला ९ आॅगस्ट रोजी  मान्यता देण्यात आली. तर त्या दोन्ही याचिका एकत्र करुन त्यावर १७ नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्या निकाली काढल्या. यामुळे रुग्णालय हस्तांतरणातील तांत्रिक अडसर दूर झाल्याने पालिका व आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यामध्ये सामंजस्य करार होण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असतानाच रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे समोर आले.

तत्पुर्वी पालिकेच्या आस्थापनेवरील सुमारे ३६ अधिकारी व कर्मचारी सरकारी सेवेत सामावुन घेण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. परंतु, हे रुणालय चालवण्यासाठी १०० हून अधिक मनुष्यबळ आवश्यक ठरणार असल्याने त्यांच्या पदनिर्मितीला अद्याप सरकारची मान्यताच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी जानेवारीपासून सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत आरोग्य सेवा (मुंबई मंडळ), ठाणेचे उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे म्हणाल्या की हस्तांतरणानंतरही रुग्णालय नियमित सुरु ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. पद निर्मितीचा निर्णय राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोअर कमिटीकडून घेतला जातो. तो अद्याप घेण्यात आला नसला तरी त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हस्तांतरण कराराची प्रक्रिया सुरु असतानाच पद निर्मितीलाची मान्यता मिळण्याची नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक