शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पद निर्मितीत अडकला भाईंदरमधील जोशी रुणालय हस्तांतरणाचा करार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:13 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या.

राजू काळे / भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. परंतु, हे रुग्णालय राज्य सरकारकडून चालविण्यासाठी त्यात पुरेसे डॉक्टर्स व कर्मचा-यांच्या पद निर्मितीला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याची बाब समोर आल्याने रुग्णालय हस्तांतरणाचा करार त्यात अडकल्याचे समोर आले आहे. 

पालिकेने कोट्यवधींचा निधी खर्ची घालून २०१२ मध्ये बांधलेले चार मजली रुग्णालय राज्य सरकारमार्फत चालविले जावे, यासाठी आॅगस्ट २०१२ मधील महासभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी २००६ मध्ये माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी पालिकेने शहरात सर्व साधारण रुग्णालय बांधावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावरील अंतिम सुनावणी प्रलंबित असल्याने पालिकेने त्या मंजूर ठरावाच्या अनुषंगाने न्यायालयाकडे हस्तांतरणासाठी परवानगी मागितली. ती न्यायालयाने फेटाळून रुग्णालय पालिकेनेच चालविण्याचे आदेश दिले. त्याला पालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता या न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे सरकारचे दरवाजे बंद झाल्याने पालिकेने राजकीय माध्यमातून रुग्णालय हस्तांतरणाचा मुद्दा सरकारकडे रेटण्यास सुरुवात केली. आ. प्रताप सरनाईक यांच्यासह आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यातच १० जानेवारी २०१६ रोजी रुग्णालयाचे लोकार्पण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्यमंत्र्यांच्याच हस्तेच पार पाडण्यात आले. तद्नंतर ३० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत रुग्णालय हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली. परंतु, न्यायालयाने रुग्णालय पालिकेनेच चालवावे, असे आदेश दिले असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या हस्तांतरणाच्या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा दावा करीत म्हात्रे यांनी १५ फेब्रुवारीला पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

एका बाजूला रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रीया सुरू असताना पालिकेकडुन रुग्णालयात देण्यात येणारी रुग्णसेवा असमाधानकारक असल्याचा दावा करणारी दुसरी याचिका महेंद्र लोरीक यादव यांनी ६ जानेवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान ९ आॅगस्ट रोजी पालिकेने रुग्णालय हस्तांतरणाचा प्रारुप सामंजस्य करार राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला. त्याला ९ आॅगस्ट रोजी  मान्यता देण्यात आली. तर त्या दोन्ही याचिका एकत्र करुन त्यावर १७ नोव्हेंबरला पार पडलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्या निकाली काढल्या. यामुळे रुग्णालय हस्तांतरणातील तांत्रिक अडसर दूर झाल्याने पालिका व आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्यामध्ये सामंजस्य करार होण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असतानाच रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे समोर आले.

तत्पुर्वी पालिकेच्या आस्थापनेवरील सुमारे ३६ अधिकारी व कर्मचारी सरकारी सेवेत सामावुन घेण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. परंतु, हे रुणालय चालवण्यासाठी १०० हून अधिक मनुष्यबळ आवश्यक ठरणार असल्याने त्यांच्या पदनिर्मितीला अद्याप सरकारची मान्यताच मिळाली नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी जानेवारीपासून सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत आरोग्य सेवा (मुंबई मंडळ), ठाणेचे उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे म्हणाल्या की हस्तांतरणानंतरही रुग्णालय नियमित सुरु ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. पद निर्मितीचा निर्णय राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोअर कमिटीकडून घेतला जातो. तो अद्याप घेण्यात आला नसला तरी त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हस्तांतरण कराराची प्रक्रिया सुरु असतानाच पद निर्मितीलाची मान्यता मिळण्याची नाकारता येत नाही. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक