शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

आगरी-कोळीबांधवांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 5:08 AM

जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन : शेतजमिनी न देण्याचा इशारा

ठाणे : विविध कारणांसाठी शासनाने घेतलेल्या भूमिपुत्रांच्या जमिनी परत करा, कोस्टल रोड रद्द करा, गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित करा, अशा विविध घोषणा करून बुधवारी आगरी-कोळीबांधव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकले होते. यावेळी राबोडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉँग मार्च काढून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

२० डिसेंबरच्या महासभेत महापालिका प्रशासनाने पाच भागांमध्ये क्लस्टर राबवण्याचा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. त्यात गावठाण आणि कोळीवाडे वगळल्याचाही उल्लेख केला आहे. त्यामुळेच त्याविरोधात गावठाण आणि कोळीवाड्यांनी एकत्र येऊन बुधवारी आवाज उठवला. बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, माजिवडे, राबोडी, कळवा आणि घोडबंदर भागातील शेतजमिनी औद्योगिक प्रयोजनाकरिता घेतल्या. त्यासाठी काही शेतकऱ्यांना अत्यल्प, तर काहींना मोबदलाच दिलेला नाही. आता या जमिनींचे प्रयोजन बदलून निवासी बांधकामे असे केले जात आहे. मात्र, या प्रक्रि येमुळे मूळ मालक असलेल्यांना साधी बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. क्लस्टर राबवत असताना गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित केलेले नाही. असे असतानाही तिचा प्रस्ताव महासभेत आलाच कसा, असा सवाल यावेळी शेतकºयांनी केला.या आंदोलनाच्या निमित्ताने घोडबंदर भागातील कोस्टल रोडचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा रडारवर आला. तो भूमिपुत्रांच्या दृष्टीने चुकीचा असून त्यामुळे त्यांच्या जमिनी जाणार असल्याचा दावा या शेतकºयांनी केला. यापूर्वी विविध विकासकामांसाठी घेतलेल्या जमिनींबाबत अनेकांना अजून योग्य तो मोबदला मिळालेला नाही. असे असताना पुन्हा नवनवीन प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोस्टल रोडला भूमिपुत्रांचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवाय, मेट्रो कास्टिंग यार्ड प्रकल्पास नागरिकांचा विरोध असून त्यासाठी शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. खाडीकिनारी भराव टाकून कांदळवन नष्ट केले जात असून त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. या सर्व मागण्यांकडे राज्य शासन आणि महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राबोडी पोलीस चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा लाँग मार्च काढला होता.प्रशासनावर दबाव टाकाराष्ट्रवादीने या आगरी-कोळीबांधवांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. महापालिकेत सत्ता शिवसेनेची असल्याने आगरी-कोळी समाजातील शिवसेनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव टाकावा, असे आवाहन यावेळी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. गावठाणे आणि कोळीवाड्यांचे आधी सीमांकन निश्चित करावे. बुलेट ट्रेनसाठी जाणाºया जमिनींविरोधातही आम्ही शेतकºयांसोबत असल्याचे आश्वासन यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले.

टॅग्स :Morchaमोर्चाthaneठाणे