शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:16 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला

- धीरज परबमीरा रोड - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला आणि शुक्रवारी पाड्यातील घर अन् घर वीजेच्या दिव्यांनी उजळून निघाले. घरच नव्हे तर आपले आयुष्यच उजळून निघाल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या मनात होती. पारंपरिक वाद्य वाजवत आदिवासींनी वीजेचे जल्लोषात स्वागत केले. दीड वर्षांपासून अथक पाठपुराव्यानंतर वीजेचे स्वप्न साकारल्याची भावना आदिवासींनी यावेही व्यक्त केली.भार्इंदरच्या उत्तन - गोराई मार्गापासून सुमारे तीन किमी आत डोंगराच्या खाली वसलेला जामझाड हा ५२ उंबरठ्यांचा आदिवासी पाडा. मुंबईच्या हद्दीत आणि भार्इंदरच्या वेशीवर असलेल्या या पाड्यात जेमतेम दोनशेची लोकवस्ती आहे. भार्इंदर येथील प्रसिद्ध केशवसृष्टी - रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि रामरत्नसारखी आलिशाळा याच भागात आहे. देशाच्या ज्युडिशीयल अकादमी पासून हा पाडा हाकेच्या अंतरावर आहे. लोकप्रतिनिधी, न्यायपालिका आणि प्रशासनाच्या शिबिरांमधून देश घडवण्याच्या विचारांसह सत्ताकारणाची खलबते होत असली तरी उशाशी असलेला हा पाडा मात्र पाणी, वीज, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अशा मूलभूत गरजांपासूनच वंचित राहिलेला आहे.या भागातील मोठी डोंगरी, छोटी डोंगरी, मुंडा पाडा, बाबर पाडा, बोरकरपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये २००३ मध्येच वीज आली. पण जामझाड पाडा मात्र विजेपासून वंचित होता. नेहमीप्रमाणे निवडणूक आली की वीज, पाणी देऊ अशी आश्वासनेच या पाड्यातील लोकांना मिळायची. वीज तर नाहीच पण, पाणी देखील एका डबक्यातून भरावे लागायचे. हल्ली कुठे लायन्स क्लबने एक बोअर मारून दिल्याने शुध्द पाणी मिळते आहे. शिक्षकच नसल्याने शिकायची सोय नाही. शिक्षणासाठी गोराई किंवा मनोरी गावात जायचे. त्यासाठी घरापासून रोजची जवळपास ३ किमीची पायपीट आणि मग मिळेल ते वाहन पकडून शाळा गाठायची. घरात कोणी आजारी पडले तरी तरी वैद्यकिय सुविधेसाठी गोराई वा उत्तनला जावे लागते. आदिवासी म्हणून जातीचे दाखले नाहीत.काहींना मजुरी - रोजगार चांगला मिळाला म्हणून घरे बांधली. पण वीज, पाणी नाही. ७ -८ कुटुंबांनी जास्त पैसे मोजत लांबून वीज पुरवठा घेतला. पण बहुतांश पाडा तसा अंधारातच. मनसैनिक असलेली सुषमा दवडे ही मोठी डोंगरी पाड्यात सून म्हणून आली आणि या ९ वी शिकलेल्या सुनेने आपल्या सासरच्या मंडळींना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्याचा चंग बांधला. बोरिवलीतील मनसेचे शाखाध्यक्ष महेश नर सह पाड्यातील चंदू परेड, सुनिता परेड आदी लोकांची साथ मिळत गेली. नोव्हेंबर २०१७ पासून पाड्यातील विविध सुविधांसाठी त्यांनी पाठपुरावा सुरु केला होता.स्थानिक आमदार व पालकमंत्री विनोद तावडे यांना मंत्रालयात भेटण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आदिवासी भगिनी - बांधवांना घेऊन दवडे ह्या मंत्रालयात गेल्या. त्यावेळी अदिवासींचे पोषाख बघून आतच सोडले नाही. नंतर काहींना आत सोडले. तावडेंनी समस्या सोडवण्यासाठी जातीने पुढाकार घेतल्याचे दवडे यांनी सांगितले. याचबरोबर खा. गोपाळ शेट्टी, स्थानिक आजी - माजी नगरसेवकांकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी सहकार्य केले. शुक्रवारी जोडणीचे काम पूर्ण झाले, वीज पुरवठा सुरु करताच दिव्यांनी घरे उजळली आणि पाड्यातील रहिवाशांनी एकच जल्लोष केला. ढोल - ताशे आणि पारंपरिक वाद्य वाजवून वीजेचे स्वागत केले. जागा मंजूर होऊन उपकेंद्र झाले की वीजेचा जास्त भार घेणे शक्य होणार आहे.पाठपुराव्याला मिळाले यशथेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुध्दा पत्र पाठवले. पंतप्रधान कार्यालयातुन त्याचे उत्तर आले. त्या अनुषंगाने प्रकाशगड येथे गेलो असता तेथील अधिकारी पांडुरंग पाटील यांनी जामझाड पाडा आपल्या हद्दीत नसल्याचे सांगतानाच संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गाठ घालून दिली. वीज उपकेंद्रासाठी जागा हवी होती.महसुलमंत्री पासुन जिल्हाधिकारी, तलहसिलदार, तलाठीकडे पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींनी सुध्दा पत्रं दिली. वीज कंपनीचे महाव्यवस्थापक अधिकारी सतीश कसबे यांनी खूपच सहकार्य केल्याचे दवडे म्हणाल्या.वीजेच्या उपकेंद्रासाठी अद्याप जागा मंजूर झाली नसली तरी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जागेतून केबल टाकायला परवानगी दिली. त्यासाठीचे ८० हजार रुपये शुल्क वीज कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले आहेत. अदानी वीज कंपनीने येथील वसंत स्मृती वृध्दाश्रमा पासुन जोडणी घेऊन केबल टाकण्यासह प्रत्येक घरास वीज जोडणी आणि मीटर बसवणे आदी काम दीड महिन्यात पूर्ण केले.शुक्रवारचा दिवस आमच्यासाठी आयुष्यातील खºया अर्थाने दिवाळीचा सण होता. काही वयोवृध्दांनी तर वीज पहिल्यांदाच पाहिली. घरातील कामं , मुलांना अभ्यास करणं आता सोपं होणार आहे. वीजेचं मोल काय असतं ते इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज आल्याने कळते आहे.- सुनिता परेड ( स्थानिक आदिवासी )दीड वर्षांच्या सततच्या पाठपुराव्याला देवाने दिलेला हा आशीर्वाद आहे. सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी सहकार्य केले. - सुषमा दवडे(मनसैनिक, स्थानिक आदिवासी) 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरelectricityवीज