शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

कल्याण पूर्वेत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:58 AM

खडेगोळवलीत टंचाईच्या झळा : तीन दिवसांनी रात्री येतो टँकर, पाण्यासाठी उडते झुंबड

कल्याण : शहरातील काही भागांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. पूर्वेतील खडेगोळवली गॅस कंपनी परिसरातील रामा व दत्ता कॉलनीतील नागरिक पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. महापालिकेकडून दर तीन दिवसांआड या भागाला टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. हा टॅँकरही रात्री पाठवला जात आहे. टॅँकर येताच या परिसरातील नागरिक पाण्यासाठी अक्षरश: तुटून पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रहिवाशांना टॅँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.रहिवासी रामप्रसाद पांडे म्हणाले की, आमच्या भागात १५० लोक राहतात. त्यांच्या कॉलनीला पाणी येत नाही. या कॉलनीतील नागरिकांनी महापालिकेकडे पाणी येत नसल्याची तक्रार केलेली आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ बोळवण करत आहे. त्याची दखल घेतली जात नाही. महापालिका तीन दिवसांआड एक पाण्याचा टँकर पाठवते. तोही रात्रीच्या वेळेत येत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. केवळ पिण्यापुरते कसेबसे पाणी मिळते. रात्री पथदिव्यांच्या उजेडात महिला पाण्याच्या टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी धडपड करतात. घरातील पुरुष व महिलांसह लहान मुलेही पाण्याचा टँकर आल्यावर एक हंडा पाण्यासाठी धाव घेतात. महापालिका टॅँकरने हे पाणी पुरवते. त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र, एक टॅँकर पुरेसा नसून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन टँकर रोज पाठवण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.कल्याण पूर्वेतील अनेक भागांत पाण्याची वानवा आहे. आता उन्हाळा अधिक कडक होत असून पाणीटंचाईचा त्रास मे महिन्यात आणखी वाढणार आहे. याठिकाणी पाण्याचा दाब कमी असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाला पाण्याचा टँकर पाठवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.आजचे पाण्याचे शटडाउन रद्दकल्याण-डोंबिवलीत २२ टक्के पाणीकपात लागू आहे. ही कपात मे महिन्यात वाढू शकते. लोकसभेची निवडणूक असल्याने या कपातीमधील वाढ तूर्तास तरी रोखून धरली आहे. निवडणुकीसाठी २९ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. दरमहिन्याच्या चौथ्या शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, शनिवारी कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. चौथ्या शनिवारचा शटडाउन रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीमुळे मतदारांना हा दिलासा मिळाला असला तरी मतदानानंतर असाच दिलासा मे महिन्यात मिळणार की नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.साई श्रद्धा कॉलनीला दूषित पाणीपुरवठाकाटेमानिवलीतील साई श्रद्धा कॉलनीत राहणारे कैलास रोकडे यांनी सांगितले की, साई विहार कॉलनीच्या नळातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे २४ नोव्हेंबर २०१८ रोजी तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल घेतलेली नाही. या भागातील जलवाहिन्या गटारातून गेलेल्या असून त्या बदलल्याशिवाय हा दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे रोकडे यांनी सांगितले. तसेच या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दाब कमी असल्याने चाळीतील लोक विजेचा पंप लावतात. चाळीच्या शेजारच्या इमारतीमध्येही विजेचे पंप लावले जातात. चाळीतील विजेच्या पंपांपेक्षा इमारतीमधील विजेचे पंप अधिक क्षमतेचे असल्याने इमारतीद्वारे पाणी जास्त खेचले जाते. त्यामुळे चाळींना पंप लावूनही पाणी मिळत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई