शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

आदीवासी वस्तीगृहातील जेवणात आळ्य़ा, विद्यार्थांचे अन्नत्याग आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 5:12 PM

सरकारी आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह आहे. या वस्तीगृहातील विद्यार्थांना दिले जाणा:या जेवणात आळ्य़ा आढळून आल्याची तक्रार विद्यार्थांनी केली आहे.

कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह आहे. या वस्तीगृहातील विद्यार्थांना दिले जाणा:या जेवणात आळ्य़ा आढळून आल्याची तक्रार विद्यार्थांनी केली आहे. वस्तीगृहाला जेवण पुरविणा:या कंत्रटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणी विद्यार्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. जेवण पुरविणा:या कंत्रटदाराला नोटिस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आदीवासी वस्तीगृहात राहून 96 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थांना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला देण्यात आले आहे. शुक्रवारी या विद्यार्थांना पनीरची भाजी दिली गेली होती. त्या भाजीत चक्क आळ्य़ा आढळून आल्याची बाब स्वत: विद्यार्थांनी उघडकीस आणली आहे. तसेच फळांमध्ये त्यादिवशी मुलांना केळी खाण्यास दिली असता त्याला ही किड लागल्याचे दिसून आले. याविषयी प्रथम महिला बचत गटाकडे विद्याथ्र्यानी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करण्यात आली असा आरोप विद्यार्थांनी केला आहे. एका विद्यार्थांच्या जेवणामागे महिन्याला 3 हजार 200 रुपये महिला बचत गटाला सरकारकडून दिले जातात. विद्यार्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वस्तीगृह प्रशासनाकडून यापूर्वी महिला बचत गटाला कारणो दाखवा नोटिस बजाविली आहे. मात्र आत्ता आळ्य़ा आढळून आल्या त्याचे काय असा सवाल विद्यार्थी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. ही घटना कळताच जवळच राहणारे शिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटील यांनी आज वस्तीगृहाला भेट दिली. तसेच वस्तीगृहाची पाहणी केली. वस्तीगृहाची दुरावस्था झाली असून विद्यार्थांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. त्यात आळ्य़ा सापडतात. ही गंभीर बाब आहे. वस्तीगृहाची  देखरेख करणारा अधिकारी कल्याणमध्येच राहतो. मात्र तो वर्ष झाले तरी त्या वस्तीगृहाकडे ढुंकून पाहत नाही असा आरोप पाटील यांनी केला आहे.