शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया : धनश्री लेले, पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:58 IST

संगीता धनकुटे शिक्षक गटातून तर आशिष भिडे खुला गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. 

ठळक मुद्देअभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया : धनश्री लेलेपितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीरसंगीता धनकुटे शिक्षक गटातून तर आशिष भिडे खुला गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी

ठाणे : अभिवाचक आपल्या  समोरच्या कागदावर लिहिलेलं वाचतो. हे करीत असताना या कागदावरील त्या हृदयी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम तो करीत असतो. केवळ वाचन म्हणजे अभिवाचन नसून  शब्दाला सजीव करून  त्यात प्राण फुंकतो, तो अभिवाचक. अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया आहे अशा शब्दात साहित्यिका आणि निरूपणकार धनश्री लेले यांनी मार्गदर्शन केले.               पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी उदय सबनीस, पितांबरी उद्योग समूहाच्या हेल्थ केअर युनिटचे डॉ. संदीप माळी, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, अभिवाचनाचे दोन प्रकार असतात, प्रकट वाचन आणि मूक वाचन. ग्रीक देशामध्ये याला विशेष महत्त्व आहे. विरामचिन्हे ही भाषेचा अलंकार आहेत. याचा अभिवाचकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. आजच्या युगात जिवंतपणा,जिव्हाळा, जिद्य आणि जिज्ञासा हे चार फोर जी लक्षात ठेवावेत. उदय सबनीस म्हणाले, अभिवाचन ही वाचनाची पुढची पायरी आहे. जी कथा, गोष्ट, लेख आपण वाचणार आहोत, त्याचं वाचन करण्यापूर्वी ती समजून घेतली पाहिजे. अभिवाचन म्हणजे गोष्ट सांगणे.गोष्टीपर्यंत जो श्रोत्यांना घेऊन जातो, तो उत्तम अभिवाचक. मराठी भाषिकांची स्वतःची अशी एक भाषा आहे, अभिवाचन करताना ती जपलीच पाहिजे. पण प्रमाणभाषा सुद्धा समजून घेणं गरजेचे आहे. यावेळी पितांबरी प्रॉ. प्रा. लि. च्या के नील कफ सिरप आणि के नील कोल्ड बाम या उत्पादनांचे ग्राहकार्पण करण्यात आले. डॉ. संदीप माळी यांनी या उत्पादनांची माहिती दिली. वाचन चळवळ वाढावी या हेतूने पितांबरी उद्योग समूह आणि व्यास क्रिएशन्स् या संस्थांनी राज्यस्तरीय पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी 10 जून रोजी पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 750 स्पर्धकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला. प्राथमिक फेरीतून 130 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. शिक्षक गटातून संगीता धनकुटे ( मो. ह. विद्यालय, ठाणे)  यांनी प्रथम, सुप्रिया तळेकर (कामराज नगर म्युनिसिपल मराठी स्कूल, घाटकोपर) यांनी द्वितीय तर प्रतिक्षा बोर्डे ( मो. ह. विद्यालय, ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पश्चिम महाराष्ट्र विभागातून सुरेखा हिरवे ( सरस्वती माध्यमिक विद्यालय, श्रीकृष्णनगर, आकुर्डी, पुणे), मराठवाडा विभागातून कुंजीराम गोंधळे ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रल्हादपूर, जालना), कोकण विभागातून नमिता आफळे (सोफिया पॉलिटेक्नीक, मुंबई), विशाखा देशपांडे (सरस्वती मंदिर ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल, मुंंबई) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.            खुला गटातून आशिष भिडे यांनी प्रथम, अक्षय शिंपी यांनी द्वितीय, अंजली शेवडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पश्चिम महाराष्ट्र विभागातून प्रियांका शेजाळेे, अश्विनी मराठे, उत्तर महाराष्ट्र विभागातून रश्मी पवार, डॉ. रज्जाक शेख, कोकण विभागातून सौरभ नाईक, स्मिता मेढी -नीता जयवंत यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली. बालगटातील आदि माळवदे याला विशेष पुरस्कार देण्यात आला. दोन्ही गटातील प्रथम क्रमांकासाठी 10,000/- रू. रोख, सन्मानचिन्ह आणि  प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5000/- रू. रोख,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी 3,000/- रू. रोख,सन्मानचिन्ह  आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी रोख 2,000/- आणि प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. शिक्षक गटामधील विजेत्यांना पारितोषिकाच्या रकमेची व्यास क्रिएशन्स् प्रकाशित पुस्तके त्यांच्या शाळेसाठी भेट देण्यात आली. सर्व विजेत्यांना  पितांबरी उद्योग समूहातर्फे भेटवस्तू देण्यात आली. संतोष वेरूळकर, धनश्री करमरकर, श्रीरंग खटावकर, सुनिता फडके आणि वृंदा दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. अमृता दीक्षित यांनी निवेदन केले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक