शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 4:52 PM

विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ठळक मुद्देबालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कारचकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण

ठाणे : बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे आहे. गडकरी रंगायतनमध्ये आम्ही तालमीचे स्वातंत्र्य अनुभवले आहे, कोठेही तालमी करीत असय. हे स्वातंत्र्य नव्या पिढीने घ्यावे अशा भावना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या. 

    गंधार कला संस्थाच्यावतीने  गडकरी रंगायतन येथे आयोजित गंधार युवा महोत्सवात दिगदर्शक विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ. संजय केळकर, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. डॉ. विजय जोशी, प्रा. प्रदीप ढवळ, जयंत पवार, राजू आठवले, प्रकाश निमकर, राजेश उके, महेश सुभेदार, प्रशांत डिंगणकर, प्रा. मंदार टिल्लू, प्रा. संतोष गावडे, बाळकृष्ण ओडेकर, वैभव पटवर्धन व इतर उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. त्यांनी प्रा. मंदार टिल्लू आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. डिजिटल युगात नाट्य, कला टिकवण्याचे काम कठीण आहे पण आजच्या पिढीवर हे संस्कार करण्याचे काम गंधार करीत आहे. गंधार कलावंत शोधण्याचे, कलावंत जपण्याचे काम करीत आहे. त्यांनतर लघुपट, बालनाट्यमध्ये काम केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चकवा आणि आरपार या एकांकिकेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आशुतोष बाविस्कर यांचाही गौरव करण्यात आला. सत्काराला  विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांनी उत्तर दिले. जयंत पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, नाटकासाठी प्रामाणिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे गंधार. नाट्यक्षेत्राशी जोडतो तेव्हा आपोआप व्यक्तिमत्त्व विकास होतो त्यासाठी कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची गरज नाही. विजय जोशी म्हणाले, कोणतेही पारितोषिक हा मैलाचा दगड असतो तो बाजूला सारून पुढे जा असा सल्ला उपस्थित कलाकारांना दिला. अशोक बागवे म्हणाले, आ. संजय केळकर म्हणाले, ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, अनेक कलाकार या शहरात आहे, बाहेरचे कलाकार देखील आता ठाण्यात येत आहेत. सांस्कृतिक वैभव गंधारच्या चळवळीतून वाढत जाणार आहे. पुरस्कार वितरणाच्या आधी चकवा आणि शेवटी आरपार ही एकांकिका सादर झाली. कार्यक्रमाचे निवेदन आकाश राऊत यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक