शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या, तो रस्त्यावर फेकणाऱ्या दोन उच्चभ्रू संकुलांना पालिकेचा दणका, केली अशी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 21:10 IST

घनकचरा व्यवस्थापन नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मीरा भाईंदर महापालिकेनेसुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन सातत्याने केले आहे.

मीरारोड - कायद्याने ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक असूनही कचरा वर्गीकरण न करणाऱ्या, तसेच पालिकेने कचरा घेतला नाही, म्हणून तो रस्त्यावर टाकणाऱ्या मीरारोडच्या दोन उच्चभ्रू संकुलांवर कारवाई करत प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. 

घनकचरा व्यवस्थापन नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मीरा भाईंदर महापालिकेनेसुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन सातत्याने केले आहे. मध्यंतरी कचरा वर्गीकरण केला नसेल तर तो न उचलणे, अशा कारवाया केल्या गेल्या. परंतु ठोस कारवाई केली जात नसल्याने अनेक संकुलं कचरा वर्गीकरण करत नव्हते. शहरातील झोपडपट्टी, गावठाण , व्यावसायिक आदींकडूनसुद्धा कचरा वर्गीकरण करून देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कचरा वर्गीकरण होत नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणेसुद्धा जिकरीचे बनले आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाचा पदभार उपायुक्त अजित मुठे यांनी घेतल्यानंतर आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण न करणारे व  रस्त्यावरील कचरा टाकणाऱ्यां विरोधात कारवाई सुरू केली. गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्याचे वर्गीकरण न करण्याऱ्या सोसायट्यांवर त्यांचा कचरा न उचलण्यासह त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.

 वेस्टर्न हॉटेल जवळील जेके इन्फ्रा व जेपी इन्फ्रा या उच्चभ्रु सोसायट्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण न करताच कचरा देऊ केला. पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यास सांगितले आणि कचरा नेण्यास नकार दिला. त्यानंतर सदर संकुलातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने आज शुक्रवारी उपायुक्त अजित मुठे यांनी तत्काळ संबंधित सोसायटयांवर कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड यांना दिले. त्यानुसार राठोड यांनी संबंधित दोन्ही सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी २५ हजार रुपये इतका दंड दोन्ही सोसायट्यांकडून वसूल केला.

रस्त्यावर कचरा  टाकणाऱ्या, ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायट्या, त्याचप्रमाणे परिसर अस्वच्छ करणारे व्यावसायिक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  त्यामुळे सोसायट्यांनी त्यांच्या सोसायटीतील कचऱ्याचे वर्गीकरण करुनच कचरा देण्याचे आवाहन उपायुक्त मुठे यांनी केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न