शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

अतिक्रमण विभागाची कारवाई ‘अर्थ’पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 1:04 AM

सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे;

डोंबिवली : सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे; पण त्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत का, असा गंभीर सवाल कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला. अनधिकृत बांधकामांवर कारवाई निश्चित झाली पाहिजे; पण अनधिकृत बांधकामे उभी होत असताना महापालिकेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत होते का? ज्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे उभी राहीली, त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई का केली जात नाही, असे सवालही आ. गायकवाड यांनी केले.महापालिकेच्या कारवाईसंदर्भात गायकवाड यांनी ‘लोकमत’जवळ संतप्त भावना व्यक्त केली. अनधिकृत कामे रातोरात होत नाहीत. प्रभाग अधिकाºयांसह अन्य वरिष्ठ अधिकाºयांच्या वरदहस्त असल्याशिवाय टोलेजंग इमारतींची बांधकामे पूर्ण होवू शकत नाहीत. त्यामुळे यासाठी ते अधिकारीदेखील तेवढेच जबाबदार आहेत. अनधिकृत बांधकामे जिथे झाली आहेत, तेथील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना तात्काळ बडतर्फ करुन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करणे गरजेचे आहे. बांधकामे झाल्यावर कारवाईची वेळ आली की अधिकारी सर्वसामान्यांच्या जीवाची घालमेल बघत आनंद लुटतात. तिथे रहायला आलेल्या सर्वसामान्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी पणाला लावलेली असते. काटकसर करून ते घर घेतात. अनधिकृत घरे घेताना त्यांचीही चूक असली, काहीसे स्वस्तात घर मिळत असल्याने फसव्या जाहिरातींच्या भुलभुलैय्यात ते अडकतात. वास्तविक अधिकाºयांच्या कामचुकारपणाचा, अर्थपूर्ण स्वार्थाचा फटका त्या सर्वसामान्य नागरिकांना बसतो.गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने पाठवलेल्या कारवाईच्या नोटीसांमुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते तणावाखाली आहेत. आपण बेघर होणार की काय, या भावनेने ते भयभीत झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधल्या, विकल्या आणि आता ते हात वर करतील हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे ज्यांची घरे आहेत त्यांना कुणी वाली नाही. ज्यांनी पैसे गुंतवले ते बेघर होणार आहेत.आगामी काळात अशी बांधकामे होणार नाहीत, यासाठीही ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जोशी हे नोटीस बजावत असल्याने सर्वसामान्य नागरिक दडपणाखाली असून, सर्वसामान्यांच्या जीवावर मस्तवाल झालेले बांधकाम व्यावसायिक व अधिकाºयांना अभय का, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईच्या नोटीशीद्वारे दडपण तयार करून बांधकाम व्यावसायिक तडजोडीसाठी येतील याची जोशींना अपेक्षा आहे का, असा आरोपही गायकवाड यांनी केला.>अतिक्रमण झालेल्या ठिकाणी आयुक्त गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. आरक्षित जागांवर तसेच रस्त्याच्या नियोजनात बाधा येत असल्यास संबंधित बांधकामांवर कारवाई अटळ आहे. जेथे आता अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, अशा बहुतांश ठिकाणी कारवाई होणारच. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्यात अर्थपूर्ण उद्देश असण्याचा प्रश्नच नाही. जी अनधिकृत बांधकामे झाली किंवा होत असतील, त्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा मला अधिकार नाही. - सुनील जोशी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका