शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

ठाणे जिल्ह्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळ बंदची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:06 PM

ठाणे जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.

सुरेश लोखंडे/ ठाणे : जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देऊन त्याच्या येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था न केल्यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यतील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. यामुळे गावक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा कमी विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्याची कारवाई शिक्षण विभागाव्दारे करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद व पाचही पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे रणशिंगही फुंकण्यात आले आहेत. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील बोराडपाडा परिसरातील सिंधीपाडा, वा-याचा पाडा, लव्हाळी येतील तीन शाळा दोन दिवसांपूर्वीच बंद केल्या आहेत. या शाळांवरील शिक्षकाना आता अंबरनाथ पंचायत समितीमध्ये काम देण्यात आले. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये प्रवेश न करता व त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था न करता त्यांना वाºयावर सोडून देण्यात आल्यामुळे या गावांमधील पालकांकडून सांगितले जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सुमारे १८ शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये आस्नोली बारवीडॅम, शिंदीपाडा, वाडी, भिनारपाडा, कातकरीवाडी, दात्रयाचीवाडी, भेंडीपाडा, साई, सावरोली, कोपºयाचीवाडी, पादीरपाडा, उमरोली, बांधनवाडी, डोणे या शाळां बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यातील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. या शाळांचे सुमारे २१ शिक्षकाना त्यांची दैनंदिन हजेरी अंबरनाथ पंचायत समितीवर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. जिल्ह्यात केवळ दहा शाळा बंद करण्याची कारवाई झाल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी पत्रकाराना सांगितले होते. मात्र अंबनाथ तालुक्यातच १८ शाळा बंद होत असून उर्वरित चार तालुक्यात अशा सुमारे कितीतरी शाळा बंद होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरून शिक्षण विभागाकडून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे.

सुमारे वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. यामध्ये एक ते पाच विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांसह सहा ते दहा, ११ ते १५ आणि १६ ते २० विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा समावेश आहे. मात्र या शाळा बंद करण्यापूर्वी त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या म्हणजे एक किमी. परिसरातील शाळांमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. याशिवाय त्याना येजा करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे अपेक्षित आहेत. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा बंद करण्यासाठी प्रथम संबंधीत ग्राम पंचायतीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे अपेक्षित आहे. परंतु तसे ठराव नसतानाही शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येत असल्यामुळे गावकरी व प्रशासन यांच्यात कोणत्याही क्षणी तीव्र संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता आहे. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. शासन आदेशानुसार या शाळा बंद केल्या जात असून त्यांचा आढावा लवकरच घेण्यात येईल. मात्र या शाळेच्या विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येत आहे.- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. ठाणे

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका