शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळ बंदची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 22:06 IST

ठाणे जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे.

सुरेश लोखंडे/ ठाणे : जिल्ह्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शेकडो शाळा बंद करण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. यातील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देऊन त्याच्या येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था न केल्यामुळे जिल्ह्यातील गावखेड्यतील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. यामुळे गावक-यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा कमी विद्यार्थी संख्ये अभावी बंद करण्याची कारवाई शिक्षण विभागाव्दारे करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद व पाचही पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे रणशिंगही फुंकण्यात आले आहेत. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. यानुसार अंबरनाथ तालुक्यातील बोराडपाडा परिसरातील सिंधीपाडा, वा-याचा पाडा, लव्हाळी येतील तीन शाळा दोन दिवसांपूर्वीच बंद केल्या आहेत. या शाळांवरील शिक्षकाना आता अंबरनाथ पंचायत समितीमध्ये काम देण्यात आले. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये प्रवेश न करता व त्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था न करता त्यांना वाºयावर सोडून देण्यात आल्यामुळे या गावांमधील पालकांकडून सांगितले जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सुमारे १८ शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यामध्ये आस्नोली बारवीडॅम, शिंदीपाडा, वाडी, भिनारपाडा, कातकरीवाडी, दात्रयाचीवाडी, भेंडीपाडा, साई, सावरोली, कोपºयाचीवाडी, पादीरपाडा, उमरोली, बांधनवाडी, डोणे या शाळां बंद करण्याची कारवाई सुरू आहे. यातील सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात सापडले आहेत. या शाळांचे सुमारे २१ शिक्षकाना त्यांची दैनंदिन हजेरी अंबरनाथ पंचायत समितीवर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. जिल्ह्यात केवळ दहा शाळा बंद करण्याची कारवाई झाल्याचे शिक्षणाधिकारी मीना यादव शेंडकर यांनी पत्रकाराना सांगितले होते. मात्र अंबनाथ तालुक्यातच १८ शाळा बंद होत असून उर्वरित चार तालुक्यात अशा सुमारे कितीतरी शाळा बंद होत असल्याचे निदर्शनात आले आहे. यावरून शिक्षण विभागाकडून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे.

सुमारे वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. यामध्ये एक ते पाच विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांसह सहा ते दहा, ११ ते १५ आणि १६ ते २० विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांचा समावेश आहे. मात्र या शाळा बंद करण्यापूर्वी त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या म्हणजे एक किमी. परिसरातील शाळांमध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. याशिवाय त्याना येजा करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे अपेक्षित आहेत. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडण्यात आल्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा बंद करण्यासाठी प्रथम संबंधीत ग्राम पंचायतीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव असणे अपेक्षित आहे. परंतु तसे ठराव नसतानाही शाळा बंद करण्याची कारवाई करण्यात येत असल्यामुळे गावकरी व प्रशासन यांच्यात कोणत्याही क्षणी तीव्र संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता आहे. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. शासन आदेशानुसार या शाळा बंद केल्या जात असून त्यांचा आढावा लवकरच घेण्यात येईल. मात्र या शाळेच्या विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येत आहे.- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. ठाणे

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका