शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये

By अजित मांडके | Updated: October 12, 2022 16:05 IST

दोन सत्रत नेमली जाणार पथके, महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

ठाणे - स्टेशन परिसरात फेरीवाल्यांकडून ५२ वर्षीय महिलेला मारहाण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील तसेच सॅटीस खालील फेरीवाले गायब झाले होते. परंतु तरी देखील रात्रीच्या सुमारास सॅटीसखाली फेरीवाल्यांचा विळखा दिसत असून महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने याठिकाणी दोन सत्रत दोन पथके सज्ज करण्याचे निश्चित केले आहे. कोणत्या वेळेत फेरीवाल्यांचा वावर या भागात जास्त असतो, त्यावेळेत ही पथके कारवाईसाठी सज्ज ठेवली जाणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढतांना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणा:या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. या घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.

परंतु आता महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार सकाळी १० ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवालांचा वावर अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके सज्ज केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली. त्यानुसार आता नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना तशी माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी देखील होती पथके तरीही होते फेरीवालेयापूर्वी देखील तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात येथे फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथके सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच वाहन देखील या ठिकाणी होते, मात्र तरी देखील या ठिकाणी फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढतांना दिसून आले होते. त्यामुळे आता नव्याने पथके नेमल्यानंतर फेरीवाले कमी होतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका