शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; महापालिका आली अ‍ॅक्शन मोडमध्ये

By अजित मांडके | Updated: October 12, 2022 16:05 IST

दोन सत्रत नेमली जाणार पथके, महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.

ठाणे - स्टेशन परिसरात फेरीवाल्यांकडून ५२ वर्षीय महिलेला मारहाण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील तसेच सॅटीस खालील फेरीवाले गायब झाले होते. परंतु तरी देखील रात्रीच्या सुमारास सॅटीसखाली फेरीवाल्यांचा विळखा दिसत असून महापालिका या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने याठिकाणी दोन सत्रत दोन पथके सज्ज करण्याचे निश्चित केले आहे. कोणत्या वेळेत फेरीवाल्यांचा वावर या भागात जास्त असतो, त्यावेळेत ही पथके कारवाईसाठी सज्ज ठेवली जाणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढतांना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणा:या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. या घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.

परंतु आता महिलेला झालेल्या मारहाणीनंतर पालिका पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यानुसार सकाळी १० ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवालांचा वावर अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके सज्ज केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली. त्यानुसार आता नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना तशी माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी देखील होती पथके तरीही होते फेरीवालेयापूर्वी देखील तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात येथे फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथके सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच वाहन देखील या ठिकाणी होते, मात्र तरी देखील या ठिकाणी फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढतांना दिसून आले होते. त्यामुळे आता नव्याने पथके नेमल्यानंतर फेरीवाले कमी होतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका