शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बिहारच्या तुरूंगातून पळालेला तिहेरी खुनाचा आरोपी ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 7:01 PM

तिहेरी खून प्रकरणात राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर बिहारच्या तुरूंगातून पळालेल्या एका कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. फरारीच्या काळात त्याने खून प्रकरणातील साक्षीदारांना धमक्याही दिल्या.

ठळक मुद्देराष्ट्रपतींनी केली होती फाशीची शिक्षा रद्दवर्षभरापासून होता फरारठाणे पोलिसांची गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

ठाणे : तिहेरी खून प्रकरणामध्ये शिक्षा भोगताना बिहारमधील बक्सर तुरूंगातून पळालेल्या कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. बिहार पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.बिहारमधील पूर्व चंपारन जिल्ह्यातील इंद्रगाची येथील परजितकुमार रामबढाई सिंग (३९) याने किरकोळ कारणावरून तिघांचा खून केला होता. १0 एप्रिल १९९८ रोजी याप्रकरणी टाऊन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये परजितकुमारची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असता, त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बिहारमधील बक्सर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना परजितकुमार आणि इतर गुन्ह्यांमधील चार आरोपी ३0 डिसेंबर २0१६ रोजी तुरूंगातून पळून गेले. धोतरांचा दोरीसारखा वापर करून ते तुरूंगाच्या भिंतींवरून उतरले होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तुरूंगातून पळून गेल्याप्रकरणी बक्सर टाऊन पोलीस ठाण्यात परजितकुमार, सोनू सिंह, सोनू पांडे, देवधारी राय आणि उपेंद्र सहा यांच्याविरूद्ध ३१ डिसेंबर २0१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी सोनू पांडे आणि देवधारी राय यांना अटक करण्यात बिहार पोलिसांना यश आले. परजितकुमारसह उर्वरित तीन आरोपी फरारच होते.तुरूंगातून पळाल्यापासून परजितकुमार त्याचे वास्तव्य वेळोवेळी बदलत होता. अवघ्या वर्षभरात त्याने दिल्ली, कोलकाता, गुजरात, नाशिक, मुंबई, ठाणे तसेच नेपाळ आदी ठिकाणी वास्तव्य केले. बिहारमधील बेथिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनयकुमार तसेच या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनिषकुमार यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना ही माहिती दिली. गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके तयार करून तीन महिने त्याचा शोध घेतला. बुधवारी भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण पोलीस यंत्रणा प्रचंड व्यस्त असताना गुन्हे अन्वेषण शाखेला परजितकुमारची ठोस माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ठाण्यातील सिडको बसथांब्याजवळून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.खंडणीसाठी साक्षीदारांना धमक्याफाशीची शिक्षा राष्ट्रपतींनी रद्द केल्यानंतर परजितकुमारने त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतला. तुरूंगातून पळाल्यानंतर त्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातसह नेपाळमध्येही वास्तव्य केले. यादरम्यान त्याने बिहारमधील काही लोकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या. त्याच्याविरूद्ध दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदारांनाही त्याने धमकावले. त्यांना १0 लाख रुपये खंडणीची मागणी त्याने केली. पंचारण जिल्ह्यातील कालीबाग टाऊन पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १४ डिसेंबर २0१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस