शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

अपघात , आत्महत्या कि हत्या ? महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गुढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 20:54 IST

भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला .  प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा  संशय व्यक्त होत आहे . 

मीरारोड - भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला .  प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा  संशय व्यक्त होत आहे .  रेल्वे पोलिसांनी , लोकलच्या धडकेने तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे . तर मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र  प्रेमप्रकरणातून तिची हत्या  झाल्याचा आरोप केलाय . 

विलेपार्ले महामार्गा जवळील संभाजी नगर मध्ये राहणारी  शिल्पा यडलम पुट्टा ( 20 ) हिचा मृतदेह भाईंदर रेल्वे स्थानक जवळच्या वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री साडे आकाराच्या सुमारास आढळून आला .  

शिल्पा हि कला शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होती . तिच्या वडिलांना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास तिने फोन केला होता . एका मुलाशी आपले प्रेम असल्याचे तिने सांगितले होते . त्यावर वडिलांनी तू घरी ये , तुमचं लग्न लाऊन देऊ असे सांगितल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे होते . प्रेमप्रकरणातूनच आपल्या मुलीची हत्या करण्यात आली आहे . तिने जेव्हा कॉल केला तेव्हा आजूबाजूला मुलांचा आवाज येत होता असे कुटुंबीयांनी म्हटले . 

रेल्वे रुळावरून तिला उचलून आणत असताना तिच्यात जीव होता . तिच्या फक्त डोक्यालाच जखम आहे . व तिचा मोबाईल देखील तिच्या हातातच होता असे तिला उचलून आणणाऱ्यांनी सांगितल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात . 

तर विरार कडे जाणाऱ्या लोकल च्या धडकेत ती मरण पावली . शिल्पा हि रेल्वे रुळावरून चालली होती व  सतत हॉर्न वाजवून देखील ती बाजूला झाली नाही असे लोकलच्या चालकाने भाईंदर रेल्वे पोलिसांना कळवले होते असे वरिष्ठ निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले . 

पालकांच्या मागणी नुसार शिल्पाचा मृतदेह मुंबईच्या जे . जे . रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे . अकस्मात मृत्यूची नोंद केली असून चौकशी सुरु आहे असे ते म्हणाले . दरम्यान लोकल चालकाने दिलेली माहिती तसेच शिल्पाने प्रेम प्रकरण वा प्रेम विवाह वरून आत्महत्या केल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Deathमृत्यूMira Bhayanderमीरा-भाईंदरCrimeगुन्हाnewsबातम्या