शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 12:26 IST

शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

मीरारोड - मीरा भाईंदर सह वसई विरार व परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेचे काम एमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कामातील अडथळे दूर करून, आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात व येत्या एक - दिड वर्षांत योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासनास दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अपुरे पाणी आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

२०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी तीन वर्षांपूर्वी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे मीरारोड येथे भूमिपूजन केले गेले . परंतु योजना मात्र आजही बारगळलेली आहे. शिवाय  पालघरमधील स्थानिकांचासुद्धा वसई - विरार व मीरा भाईंदरला पाणी देण्यास विरोध आहे. 

मेट्रो ४ व मेट्रो १० जोडणाऱ्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा -मुंबई मेट्रो मार्ग-४ हा वडाळा - कासारवडवली - गायमुखपर्यंत तर मेट्रो मार्ग क्रमांक १० हा दहिसर - काशिमीरा ते भाईंदर, असा असून या दोन्ही मेट्रोचे काम सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी गायमुख ते काशीमीरा या अंदाजे ५ किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी अशी सरनाईक यांची मागणी होती. ठाणे - मीरा भाईंदर - मुंबई, असे हे सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास लाखो लोकांना त्याचा फायदा होईल यामुळे ही मेट्रो एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे ते म्हणाले . त्यावर या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मीरा भाईंदर महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार व शहरातील कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा झाली.  शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न , झोपडपट्टी पुनर्वसन योजना , मीरा भाईंदरमधील न्यायालय इमारतीचे काम , डीम्ड कन्व्हेन्स, बीएसयुपी योजनेला गती देणे, भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल मंजूर करणे , भाईंदरमध्ये जैव विविधता उद्यान विकसित करण्यास निधी उपलब्ध करून देणे आदी मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांना आमदार गीता जैन व आपण निवेदन दिल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेWaterपाणी