शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 12:26 IST

शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

मीरारोड - मीरा भाईंदर सह वसई विरार व परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेचे काम एमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कामातील अडथळे दूर करून, आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात व येत्या एक - दिड वर्षांत योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासनास दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अपुरे पाणी आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

२०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी तीन वर्षांपूर्वी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे मीरारोड येथे भूमिपूजन केले गेले . परंतु योजना मात्र आजही बारगळलेली आहे. शिवाय  पालघरमधील स्थानिकांचासुद्धा वसई - विरार व मीरा भाईंदरला पाणी देण्यास विरोध आहे. 

मेट्रो ४ व मेट्रो १० जोडणाऱ्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा -मुंबई मेट्रो मार्ग-४ हा वडाळा - कासारवडवली - गायमुखपर्यंत तर मेट्रो मार्ग क्रमांक १० हा दहिसर - काशिमीरा ते भाईंदर, असा असून या दोन्ही मेट्रोचे काम सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी गायमुख ते काशीमीरा या अंदाजे ५ किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी अशी सरनाईक यांची मागणी होती. ठाणे - मीरा भाईंदर - मुंबई, असे हे सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास लाखो लोकांना त्याचा फायदा होईल यामुळे ही मेट्रो एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे ते म्हणाले . त्यावर या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मीरा भाईंदर महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार व शहरातील कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा झाली.  शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न , झोपडपट्टी पुनर्वसन योजना , मीरा भाईंदरमधील न्यायालय इमारतीचे काम , डीम्ड कन्व्हेन्स, बीएसयुपी योजनेला गती देणे, भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल मंजूर करणे , भाईंदरमध्ये जैव विविधता उद्यान विकसित करण्यास निधी उपलब्ध करून देणे आदी मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांना आमदार गीता जैन व आपण निवेदन दिल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेWaterपाणी