शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 12:26 IST

शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

मीरारोड - मीरा भाईंदर सह वसई विरार व परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेचे काम एमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कामातील अडथळे दूर करून, आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात व येत्या एक - दिड वर्षांत योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासनास दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अपुरे पाणी आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

२०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी तीन वर्षांपूर्वी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे मीरारोड येथे भूमिपूजन केले गेले . परंतु योजना मात्र आजही बारगळलेली आहे. शिवाय  पालघरमधील स्थानिकांचासुद्धा वसई - विरार व मीरा भाईंदरला पाणी देण्यास विरोध आहे. 

मेट्रो ४ व मेट्रो १० जोडणाऱ्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा -मुंबई मेट्रो मार्ग-४ हा वडाळा - कासारवडवली - गायमुखपर्यंत तर मेट्रो मार्ग क्रमांक १० हा दहिसर - काशिमीरा ते भाईंदर, असा असून या दोन्ही मेट्रोचे काम सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी गायमुख ते काशीमीरा या अंदाजे ५ किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी अशी सरनाईक यांची मागणी होती. ठाणे - मीरा भाईंदर - मुंबई, असे हे सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास लाखो लोकांना त्याचा फायदा होईल यामुळे ही मेट्रो एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे ते म्हणाले . त्यावर या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मीरा भाईंदर महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार व शहरातील कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा झाली.  शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न , झोपडपट्टी पुनर्वसन योजना , मीरा भाईंदरमधील न्यायालय इमारतीचे काम , डीम्ड कन्व्हेन्स, बीएसयुपी योजनेला गती देणे, भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल मंजूर करणे , भाईंदरमध्ये जैव विविधता उद्यान विकसित करण्यास निधी उपलब्ध करून देणे आदी मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांना आमदार गीता जैन व आपण निवेदन दिल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणेWaterपाणी