शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 06:10 IST

इमारत ४० वर्षे जुनी होती, मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश

Bhiwandi Building Collapse: शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असून शनिवारी मध्यरात्री एक धोकादायक  दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना ठीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश मिळालेला आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही ४० वर्षांहून जुनी धोकादायक इमारत असून तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजली निवासी वापर आहे.या इमारती च्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला.या दुर्घटनेत पहिल्या मजल्या वरील कुटुंब या ठीगाऱ्याखाली दबले होते.स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान दाखल होत त्यांनी ठीगाऱ्या खालून एकूण सात जणांना बाहेर काढले.त्यापैकी तस्निम कौसर मोमीन वय ८ महिने व उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन वय ४० वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन वय ६५ वर्ष,फरजान लतिफ मोमीन वय ५० वर्ष,बुशरा आतिफ मोमीन वय ३२ वर्ष, अदीमा लतिफ मोमीन वय ७ वर्ष,उरूसा अतिफ मोमीन वय ३ वर्षे हे जखमी झाले आहेत.या सर्व जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकुर्ती गंभीर असून अदीमा लतिफ मोमीन व उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.

घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य हे दाखल होत त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.ही इमारत धोकादायक होती कि कसे या बाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती आयुक्त वैद्य यांनी दिली आहे.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडीDeathमृत्यू